व्यक्तिविशेष : मुंशी प्रेमचंद
WD
शिक्षण खातत्यात नोकरी करणार्या प्रेमचंदांनी 1921 मध्ये गांधीजींच्या प्रभावामुळे नोकरी सोडली. 15 कादंबर्या आणि 300 कथा लिहिणार्या प्रेमचंदांच्या सेवासदन, प्रेमाश्रम, रंगभूमी, निर्मला, कायाकल्प, गबन, कर्मभूमी, गोदान या महत्त्वाच्या कादंबर्या. गोदान ही त्यांची अमर कलाकृती भारतीय कृषक जीवनाचे महाकाव्य म्हणून ओळखली जाते. संग्राम, कर्बला, प्रेम की वेदी ही त्यांची तीन नाटके. अशा या उपन्यास सम्राटाचे 8 ऑक्टोबर 1936 रोजी निधन झाले.
