श्री महावीरजी जैन मंदिर
|
या ठिकाणी एका चांभार जातीतील व्यक्तीने महावीरांची मूर्ती कोरली होते, असे सांगितले जाते.
देवाचा टिळा या नावानेही तिला ओळखले जाते. या
|
या मंदिराच्या निर्मितीमागेही एक कथा आहे. शेकडो वर्षांपूर्वी एक गाय रोज सकाळी गवत खायला जात असे व संध्याकाळी मालकाच्या घऱी परतत असे. पण काही दिवासंपासून तिचे दूध आटायला लागले. मालक हैराण झाला.
|
तेव्हा तेथे त्याला भगवान महावीरांची मूर्ती सापडली. त्याने तेथेच त्या मूर्तीची स्थापना केली. गंभीर नदीच्या किनारी असलेले हे मंदिर २४ व्या तीर्थकराप्रती समर्पित आहे. हे मंदिर प्राचीन व आधुनिक जैन वास्तुकला आणि समकालीन कलेचे अनुपम संगम असलेले आहे.
प्राचीन जैन कला शैलीतील मंदिरांपेक्षा ते वेगळेही आहे. हे मंदिर पांढऱ्या आणि लाल दगडांनी बनलेले आहे. त्याच्या चारही बाजूला छत्री आहेत. जैन धर्मातील एक तीर्थकर प्रभू शांतीनाथ यांची ३२ फूट उंचीची मूर्ती हेही या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
येथे विशाल स्तंभावर महावीरजींच्या पादुकाही
|
|
हा सुवर्णरथ बैलांद्वारे ओढला जातो. महावीरजींच्या मूर्तीवर चार व्यक्ती चामरे ढाळतात. आसमंत भजन आणि महावीर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमून गेलेला असतो.
यानंतर मूर्तीला वाजत गाजत मंदिरात पुनर्स्थापित केले जाते.
|
सायंकाळी पूर्ण मंदिराला दिव्यांची रोषणाई केली जाते. मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या दुकानात पूजेसाठी लागणारी सर्व सामग्री उपलब्ध आहे.
पर्वकाळात भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्यांची गरज भागविण्यासाठी अनेक तात्पुरती दुकानेही असतात. राजस्थानी हस्तकलाही यावेळी पहायला मिळते.
|
कसे जावे- दिल्ली - मुंबई ब्रॉडगेज लाईनवर श्री महावीरजी रेल्वे स्टेशनहून चंदनगाव साडेसहा किलोमीटरवर आहे. हे स्थळ हिंदौनपासून अठरा, करौलीपासून २९ आणि जयपूरपासून १७६ किलोमीटरवर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी बस आणि टांग्याचीही व्यवस्था आहे.
