बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025 (15:01 IST)

उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; सहा जण जागीच दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; सहा जण जागीच दुर्दैवी मृत्यू
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एक धक्कादायक अपघात घडला. ट्रकला धडकल्यानंतर कारचे तुकडे झाले, ज्यामध्ये सहा जण जागीच ठार झाले. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात एक धक्कादायक रस्ता अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने धडक दिल्याने एर्टिगा कारमध्ये प्रवास करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेत दोघेही जखमी झाले आहे आणि त्यांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक आणि एर्टिगा कारची समोरासमोर टक्कर झाली, ज्यामुळे सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील देवा पोलीस स्टेशन परिसरातील कुटलूपूर कल्याणी नदी पुलावर घडली. एर्टिगा कार बाराबंकीहून फतेहपूरला जात होती. त्याचवेळी एका ट्रकने कारला धडक दिली.चालक यांच्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Edited By- Dhanashri Naik