संबंधित माहिती
- मेहबुबा मुफ्तींच्या शेजारी बसले उद्धव ठाकरे
- ‘हनुमान आता आमच्या बरोबर, भाजपविरोधात एकत्र लढू,’ काँग्रेससह 17 पक्षांची पाटण्यात घोषणा
- पाटण्यात जमणार विरोधकांची बैठक, मोदी सरकारविरोधात करणार एल्गार
- Jagannath Temple in London लंडनमध्ये बांधले जाणार पहिले जगन्नाथ मंदिर
- पाटणा कोर्टाने आता राहुल गांधींना पाठवले आहे समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Bihar : मृत मुलगा 7 वर्षानंतर जिवंत परतला
social media
मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये आसोपूरचे रहिवासी बृजनंदन राय आणि पिरिया देवी यांचा मुलगा बिहारी राय घरातून अचानक बेपत्ता झाला. बिहारी हा मानसिक दृष्टया कमकुवत आहे. या मुळे तो घरातून कसा आणि कधी निघाला हे कळलेच नाही. पालकांनी आपल्या मुलाचा खूप शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर वडिलांनी अंधश्रद्धेमध्ये अडकून भोंदू बाबांच्या नादी लागून आपल्या बेपत्ता मुलाचा हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांचा पुतळा बनवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले
मात्र 7 वर्षांनंतर त्यांचा मुलगा जिवंत परतल्यावर त्यांना विश्वास बसेना. त्यांचा मुलगा बिहारी राय दिल्लीतील एक संस्था आणि लखनिबिघा पंचायतीचे प्रमुख शत्रुघ्न यांच्यामार्फत घरी परतला. बिहारी घरी परतताच आई-वडीलांच्या डोळ्यात मुलगा परतल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. तिला पाहताच त्याने तिला मिठी मारली.
वडील बृजनंदन राय सांगतात की, मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्यांना अनेक वेळा स्वप्नात दिसायचे. एकदा स्वप्नात मुलगा स्वतः म्हणाला की तो जिवंत आहे. त्यांनी ही गोष्ट एका भोंदू बाबाला सांगितले तर त्यांनी तुझा मुलगा आता या जगात नाही आणि त्याचा आत्मा तुला त्रास देत आहे असे सांगितले. तुला एका पुतळ्याचे मुलगा समजून त्याच्यावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहे.
वडिलांनी त्या बाबाच्या सांगण्यावरून एक पुतळा तयार केला आणि त्याच्यावर हिंदू रीतीने अंत्यसंस्कार केले.मात्र काही दिवसांपूर्वी गावातील प्रमुखाच्या मोबाईलवर दिल्लीतील एका संस्थेने बिहारी यांच्या हयात असल्याची माहिती दिली आणि फोटो पाठवले.बिहारीची ओळख पटल्यानंतर प्रमुखाने त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. 7 वर्षानंतर बिहारी मायदेशी परतले तेव्हा त्यांच्यासोबत कुटुंबाचा आनंदही परतला
Edited by - Priya Dixit