आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये बस दरीत कोसळली; अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू
अरुणाचल प्रदेशातील बस अपघातात २१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, आंध्र प्रदेशात बस अपघातात आणखी नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. चित्तूरमध्ये ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे,तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.
एएसआरचे जिल्हाधिकारी दिनेश कुमार यांनी अपघाताची पुष्टी केली आणि सांगितले की, आज सकाळी चिंतुरू आणि भद्राचलम दरम्यान घाट रोडवर अपघात झाला. एक बस रस्त्याने उलटली. जखमींना उपचारासाठी भद्राचलम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवासी भद्राचलमहून मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर परतत असताना एका वळणावर बसचा तोल गेला आणि ती रस्त्याने उलटली आणि दुसऱ्या रस्त्यावरील दरीत पडली. बसमधील बहुतेक प्रवासी महिला आणि मुले होते.
Edited By- Dhanashri Naik