जळगाव : विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन शेतात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी गावकऱ्याच्या शेतात लावलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी रात्री उशिरा एरंडोलच्या वरखेडी गावात घडली आणि बुधवारी सकाळी ती उघडकीस आली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दीड वर्षांची मुलगी या घटनेतून सुखरूप बचावली. घटनास्थळी २ रानडुक्करही मृतावस्थेत आढळले. त्यांनी सांगितले की, घटनास्थळी एक पुरूष, त्याची पत्नी, एक वृद्ध महिला आणि २ मुले मृतावस्थेत आढळली. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
अधिकाऱ्याने सांगितले की, बंडू पाटील नावाच्या व्यक्तीच्या शेतातून जाणाऱ्या एका ग्रामस्थाला पाच जण बेशुद्ध पडलेले आणि त्यांच्याजवळ एक मुलगी रडत असल्याचे दिसले. त्यांनी या लोकांना उठवण्याचा प्रयत्न केला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी गावप्रमुख आणि पोलिसांना कळवले. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि सर्व लोकांना रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, चालत जाणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान करू नये म्हणून लावलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. या प्रकरणी एरंडोल येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By- Dhanashri Naik