गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जून 2024 (09:13 IST)

समृद्धी महामार्गा दोन कारची धडक होऊन अपघातात 6 ठार, 4 जखमी

Mumbai Nagpur Expressway
मुंबईपासून 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या जालना जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर (समृद्धी महामार्ग) काल रात्री दोन कारमध्ये धडक झाली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एक स्विफ्ट डिझायर कार इंधन भरल्यानंतर चुकीच्या बाजूने महामार्गावर शिरली आणि नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अर्टिगा कारला जाऊन धडकली. आणि अपघात झाला. 
 
दोन्ही कारमधील टक्कर इतकी भीषण होती की एर्टिगा हवेत उडी मारून महामार्गावरील बॅरिकेडवर पडली. तर प्रवासी गाडीतून रस्त्यावर पडले. अन्य कारचेही नुकसान झाले. या अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला 
 
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गाड्या काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजेच्या सुमारास डिझेल भरून स्विफ्ट कार नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या आर्टिका कारला जाऊन धडकली. जालना परिसरातील समृद्धी महामार्गावर कडवंची गाव जवळ हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. 

Edited by - Priya Dixit