संबंधित माहिती
- बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले,मोठी गर्दी उसळली
- हिवाळ्यासाठी केदारनाथ धामचे दरवाजे बंद
- चारधाम यात्रेला निघालेल्या अकोल्यातील 5 महिलांना ट्रकने चिरडले, दोघांचा मृत्यू
- Chardham Yatra: बद्रीनाथ आणि यमुनोत्रीमध्ये चार यात्रेकरूंचा मृत्यू,मृतांची संख्या 150 च्या पुढे
- चारधाम यात्रेदरम्यान आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू
केदारनाथ यात्रे दरम्यान महाराष्ट्रातील एका प्रवाशाचा मृत्यू
रुद्रप्रयागमधील केदारनाथ धाम यात्रेदरम्यान गौरीकुंडजवळ महाराष्ट्रातील एका यात्रेकरूचा मृत्यू झाला. गणेश कुमार गुप्ता असे या भाविकाचे नाव आहे. डीडीआरएफ टीम गौरीकुंड घटनास्थळी पोहोचली आणि त्या व्यक्तीला गौरीकुंड आरोग्य केंद्रात आणले. जिथे डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास यात्रेकरू गणेशकुमार शोभलाल गुप्ता (66, रा. श्रीकृष्ण नगर, हुडको, सिडको कॉलनी, औरंगाबाद, महाराष्ट्र हे पायी चालत मंदिराकडे निघाले.
गौरीकुंडच्या मुख्य प्रवेशद्वारापासून थोडे अंतर चालत असतानाच ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले . त्याच्यासोबत असलेल्या लोकांनी इतरांच्या मदतीने पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाला माहिती दिली. डीडीआरएफ टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांना गौरीकुंड रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी सांगितले आहे की मृत्यूचे कारण कदाचित हृदयविकाराचा झटका असावा.
Edited By - Priya Dixit
