७ जुलैला लग्न आणि १३ जुलैला मृत्यू; लग्नानंतर मांड्वपरतणीला जात असताना नववधूचा अपघात
जळगावमध्ये एका रस्ते अपघातात लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांनी २१ वर्षीय नववधू मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जळगावमध्ये सोमवारी एक हृदयद्रावक घटना घडली,आनंदी विवाहसोहळ्यावर दुःखाची छाया पसरली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने २१ वर्षीय नवविवाहित वैशाली भाऊसाहेब पाटील हिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना जळगावमधील विद्यापीठासमोर घडली.
वैशाली पाटील हिचा विवाह ७ जुलै रोजी झाला होता. वैशालीचे काका तिला तिच्या माहेरी घेऊन जाण्यासाठी आले होते. ते दोघे दुचाकीवरून निघाले. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना, मागून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. वैशालीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. नवविवाहित वधूच्या अकाली मृत्यूमुळे रुग्णालय परिसरात शोककळा पसरली. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनाचा पोलीस शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जळगावमध्ये सोमवारी एक हृदयद्रावक घटना घडली,आनंदी विवाहसोहळ्यावर दुःखाची छाया पसरली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने २१ वर्षीय नवविवाहित वैशाली भाऊसाहेब पाटील हिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना जळगावमधील विद्यापीठासमोर घडली.
ALSO READ: समोर वाघ दिसल्याने वडिलांनी मुलाला घेऊन धरणात उडी मारली; दोघांचा बुडून मृत्यू, नागपूर मधील घटना
ALSO READ: तुकाराम मुंडेंनी भेसळ करणाऱ्यांची कंबर मोडली; एफडीएची राज्यभरात २८ ठिकाणी धाड, २१ जणांना अटक
Edited By- Dhanashri Naik
