संबंधित माहिती
- भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याच्या सासऱ्यांना मुंबईतील मारहाण प्रकरणात सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला
- पुण्याच्या पर्वती परिसरात ५० वर्षीय व्यक्तीने ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली
- सिंधुदुर्ग : शाळेतील ध्वजारोहण सोहळ्यानंतर महिला शिक्षिका बेपत्ता
- नागपूरच्या कलमना येथील दोन सॉ मिलमध्ये भीषण आग
- महाराष्ट्रातील हवामानाने पुन्हा एकदा वळण घेतले; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि विजांचा अंदाज वर्तवण्यात आला
"काम नाही तर पद नाही" एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना इशारा; संघटनात्मक कामात कमी पडणाऱ्या मंत्र्यांचे फेरबदल करण्याचे संकेत
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटनात्मक कामात कमी पडणाऱ्या मंत्र्यांच्या फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले आहे.
दिवाळीपूर्वी मोठे मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता आहे. जे मंत्री पक्ष संघटना मजबूत करण्यात अपयशी ठरले आहे, त्यांना मंत्रिपद सोडून संघटनात्मक जबाबदारी देऊन "डच्चू" मिळू शकतो. तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर देण्यात येणार आहे.
ही चर्चा जिल्हा परिषद-मनपा निवडणुकांनंतरच्या कामगिरी आढाव्यातून अधिक तीव्र झाली आहे. शिंदे यांनी "काम नाही तर पद नाही" अशा स्पष्ट इशाऱ्यासह मंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहे.
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये हे बदल शिवसेना (शिंदे गट) च्या अंतर्गत संघटनात्मक बळकटीसाठी असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला हा इशारा केवळ प्रशासकीय सुधारणेसाठी नसून, तो आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी मजबूत करण्याचा एक भाग मानला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काळात मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. कामगिरीचा 'रिपोर्ट कार्ड' तयार करण्यात आला असून, ज्या मंत्र्यांविरुद्ध स्थानिक पातळीवर तक्रारी आहे किंवा ज्यांचे जनसंपर्क कमी झाले आहे, त्यांना डच्चू देऊन नव्या दमाच्या आमदारांना संधी दिली जाऊ शकते.
तसेच केवळ सरकारमध्येच नव्हे, तर पक्षातही संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना कामाची गती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
Edited By- Dhanashri Naik
दिवाळीपूर्वी मोठे मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता आहे. जे मंत्री पक्ष संघटना मजबूत करण्यात अपयशी ठरले आहे, त्यांना मंत्रिपद सोडून संघटनात्मक जबाबदारी देऊन "डच्चू" मिळू शकतो. तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर देण्यात येणार आहे.
ही चर्चा जिल्हा परिषद-मनपा निवडणुकांनंतरच्या कामगिरी आढाव्यातून अधिक तीव्र झाली आहे. शिंदे यांनी "काम नाही तर पद नाही" अशा स्पष्ट इशाऱ्यासह मंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला हा इशारा केवळ प्रशासकीय सुधारणेसाठी नसून, तो आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी मजबूत करण्याचा एक भाग मानला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काळात मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. कामगिरीचा 'रिपोर्ट कार्ड' तयार करण्यात आला असून, ज्या मंत्र्यांविरुद्ध स्थानिक पातळीवर तक्रारी आहे किंवा ज्यांचे जनसंपर्क कमी झाले आहे, त्यांना डच्चू देऊन नव्या दमाच्या आमदारांना संधी दिली जाऊ शकते.
तसेच केवळ सरकारमध्येच नव्हे, तर पक्षातही संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना कामाची गती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
Edited By- Dhanashri Naik
