पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने जारी केला अलर्ट
Maharashtra News: भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या काळात पूर्व आणि ईशान्य भारतासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अवकाळी पावसाचा परिणाम देशाच्या विविध भागांसह महाराष्ट्रावर झाला आहे आणि त्याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. पिकलेल्या पिकांचे आणि बागांचे मोठे नुकसान झाले आहे. आता भारतीय हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या काळात पूर्व आणि ईशान्य भारतासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची अपेक्षा आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे विभागाने म्हटले आहे.
Edited By- Dhanashri Naik