संबंधित माहिती
- 'लाडका भाऊ योजने'वर संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप, संजय निरुपम यांचे प्रत्युत्तर
- संजय राऊत यांनी केले लालू यादवांच्या विधानाचे समर्थन म्हणाले-
- दोन वर्षांची फसवणूक, राज्याला कर्जबाजारी केले', संजय राऊतांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल
- महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतचा वाद वाढला शरद पवार यांनी केलं मोठं वक्तव्य
- संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही,काँग्रेसचे वक्तव्य
महाविकास आघाडी प्रत्येक जागेवर काम करत आहे-संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, की दिल्लीत अल्पमताचे सरकार बसले आहे. हे सरकार निवडून आल्यापासून मोहन भागवत यांनी अनेक गोष्टी उघड केल्या आहे. देशात जे काही सुरु आहे. ते लोकतंत्र आणि संविधानासाठी योग्य नाही.
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा सुरु आहे. आणि प्रत्येक पक्ष आपापल्या जागांचे मूल्यांकन करत असल्याचे म्हटले आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर बोलताना ते म्हणाले, तिन्ही पक्ष प्रमुख असून ते आपापल्या जागेवर मूल्यांकन करत आहे. या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मुंबई हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. जागा वाटपावर भाष्य करताना ते म्हणाले, प्रत्येक पक्षाला सर्व जागांवर त्यांची ताकद लक्षात घेऊन निवडणूक कुठे लढवायची आहे हे ठरवण्याचा अधिकार आहे. आम्ही एकत्र भेटल्यावर जागावाटपाचा निर्णय घेण्यात येईल.
Edited by - Priya Dixit
