1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 जून 2024 (13:52 IST)

दोन वर्षांची फसवणूक, राज्याला कर्जबाजारी केले', संजय राऊतांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल

sanjay raut
एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहे. या वर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आज महाराष्ट्रात चोर आणि बदमाश सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहे. हे मला वर्तमानपत्रातील जाहिरात पाहून समजले. ही दोन वर्षे फसवणुकीची आहे. 
फसवेगिरीने हे सरकार आले आहे. राज्याला कर्जबाजारी बनवले आहे. या सरकारने महाराष्ट्रातील उद्योगांना गुजरात मध्ये जाऊ दिले आहे. हे राज्याचे दुर्देव  आहे. 
 
यासोबतच संजय राऊत म्हणाले, 'विधानसभा अध्यक्षांनी पक्षपाती निर्णय देऊन या सरकारला वाचवले आहे. राज्यपालांनी असंवैधानिक बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत. या सर्वांनी हे सरकार बनवून बेकायदेशीर आणि असंवैधानिक काम केले आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने या सरकारला नाकारले आहे. विधानसभा निवडणुकीतही या सरकारचा पराभव होईल. 
 
या सरकारने स्वतःचा पक्ष काढायला हवा होता. स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवायला हवी होती. हा अर्थसंकल्प जनतेची फसवणूक करून त्यांच्या पैशाने मते विकत घेण्याचा प्रयत्न आहे. या विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेच्या पैशाने मते विकत घेण्याचा थेट प्रयत्न म्हणजे लाचखोरी आहे. 
 
Edited by - Priya Dixit