संबंधित माहिती
- राजकारणाची भाषा अशी तिखट, तिरसट आणि तुच्छतावादी का होत आहे?
- अजित पवारांच्या बंडानंतरचं पहिलं अधिवेशन, हे '6' मुद्दे ठरणार महत्त्वाचे
- अजित पवारांना अर्थखातं, राष्ट्रवादीच्या वाट्याला कृषी, सहकारासह क्रीम खाती
- Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळात फेरबदलासह खातेवाटप जाहीर, अर्थ खातं अजित पवारांकडेच
- भाजपचं हायकमांड महाराष्ट्रातील नेत्यांचं खच्चीकरण करतंय का?
सभापतींच्या नोटिशीला उद्धव ठाकरे गटाचे उत्तर नाही
विधीमंडळाच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील नोटिशीला उत्तर देण्याची मुदत आज संपली. पण अद्याप उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी या नोटिशीला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर ही कारवाई होऊ शकते.
सुत्रांच्या माहितीनुसार विधीमंडळाच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील नोटिशीला उत्तर देण्याची मुदत संपली आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांकडून विधीमंडळाच्या नोटीसला उत्तर देण्यात आले आहे. पण ठाकरे गटाच्या सर्व आमदारांकडून या अपात्रतेच्या नोटिशीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
उत्तर न दिलेल्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांना विधानसभा अध्यक्ष सुनावणीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर ठाकरे समर्थक आमदारांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती विधीमंडळ सूत्रांनी दिली आहे. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस बजावून लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले होते. तसेच ऐनवेळी म्हणणे मांडण्याची मुभा असल्याचेही म्हटले होते. यात ठाकरे गटाने मुदतीत उत्तर दिलेले नाही. त्यामुळे सभापती नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor
