संबंधित माहिती
- महाराष्ट्र राज्यात मान्सून सक्रिय, आज १० जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
- १३ दिवसांच्या विलंबानंतर ठाणे जिल्ह्यात मान्सून दाखल , केडीएमसीचे दावे खोटे ठरवले
- महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाचे काऊंटडाऊन सुरु, मुंबईत ५ ते १० जून दरम्यान पावसाचे आगमन होणार!
- नागपूरमध्ये उष्णतेची लाट, २९ मे पर्यंत अलर्ट जारी
- राज्यात पुढील ४८ तासांसाठी मेघगर्जना, पाऊस आणि विजांच्या कडकडाटासाठी यलो अलर्ट जारी
मुंबई, ठाणे आणि कोकणसाठी रेड अलर्ट जारी; पुण्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने आज महाराष्ट्राच्या अनेक भागांसाठी अति तीव्र हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रातील सक्रिय चक्रीवादळ आणि सक्रिय मान्सूनमुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह कोकणातील किनारपट्टीच्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कोकण आणि मुंबई: किनारपट्टीवर मोठा धोका
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील परिस्थिती आज खूपच आव्हानात्मक असू शकते. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टी अपेक्षित आहे. मुंबई आणि ठाणे या शहरांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकणातील या तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांना ५ जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याचा सक्त सल्ला देण्यात आला आहे, कारण किनारपट्टीवर ताशी ४०-५० किमी वेगाचे सोसाट्याचे वारे आणि उंच लाटा अपेक्षित आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ भाग आणि प्रमुख शहरांसाठीही इशारा जारी करण्यात आला आहे. पुणे आणि सातारा या जिल्ह्यांतील घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या घाट परिसरात मुसळधार पावसामुळे नदीची पातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचू शकते.
नाशिक, जळगाव, धुळे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाडा: विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेचा इशारा
विदर्भात, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर नागपूर, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, वाशिम आणि गडचिरोलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर यांसारख्या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये ताशी ४०-५० किमी वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे.
Edited By- Dhanashri Naik
कोकण आणि मुंबई: किनारपट्टीवर मोठा धोका
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील परिस्थिती आज खूपच आव्हानात्मक असू शकते. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टी अपेक्षित आहे. मुंबई आणि ठाणे या शहरांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकणातील या तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांना ५ जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याचा सक्त सल्ला देण्यात आला आहे, कारण किनारपट्टीवर ताशी ४०-५० किमी वेगाचे सोसाट्याचे वारे आणि उंच लाटा अपेक्षित आहे.
नाशिक, जळगाव, धुळे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाडा: विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेचा इशारा
विदर्भात, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर नागपूर, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, वाशिम आणि गडचिरोलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर यांसारख्या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये ताशी ४०-५० किमी वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे.
Edited By- Dhanashri Naik
