बॉलीवूडचा निर्विवाद बादशाह
|
|
|
त्याच्या विचारांतही आता बराच बदल झाला आहे. विशेषतः देवदासची भूमिका करताना तो देवदास वाटत नसून शाहरूखच वाटतो, अशी टीका त्याच्यावर झाली. त्यावर तो चिडायचाही. पण आता तो त्यावर विचार करतो. अगदी आत्मचिंतनही करतो. 'चक दे इंडिया' मधून त्याने प्रतिमेतून बाहेर पडत कबीर खान उभा केला हे या आत्मचिंतनाचेच उदाहरण. समीक्षक व टीकाकारांना चोख उत्तर देणारा हा त्याचा चित्रपट आहे.
|
शाहरूखने वयाची बेचाळीशी पूर्ण केली तरी तिकिट खिडकीवर तो आजही निर्विवाद बादशाह आहे. जाहिरात जगतात त्याची ब्रँड व्हॅल्यू इतर कोणत्याही अभिनेत्यापेक्षा जास्त आहे. ओम शांती ओम' च्या निर्मितीचा पस्तीस कोटींचा खर्च त्याने वितरण हक्क बावन्न कोटी रूपयांना विकून प्रदर्शनापूर्वीच वसुल केला आहे. शिवाय व्हिडिओ, सॅटेलाईट हक्कांच्या माध्यमातून ही किंमत सत्तर कोटी रूपयांपर्यंत पोहचते. हे घडले ते केवळ तो शाहरूख आहे म्हणून. आणि म्हणूनच तो बॉलीवूडचा निर्विवाद किंग आहे.
बॉलीवूडच्या या बादशाहला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
