शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (16:20 IST)

त्या बाबाला हव्या आहेत १६ हजार बायका

देशात भोंदू  बाबांचे स्तोम आले असून नागरिकही या बाबांच्या आहारी जात आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. नवी दिल्लीतल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी गुरुवारी रात्री रोहिणी भागातील एका आश्रमातून ४० मुलींची सुटका केली आहे. यामध्ये वृत्त असे की स्वयंघोषित संत विरेंद्र देव दीक्षितच्या आश्रमातून या मुली सोडवल्या आहेत. वाईट असे की त्याला १६ हजार बायका त्याच्या सोबत हव्या आहेत. जसे भगवान श्रीकृष्णांनी १६ सहस्त्र नारींना पत्नीचा दर्जा दिला होता या आख्यायिकेला प्रमाण मानत स्वत:ला ईश्वरी अवतार भासवणाऱ्या या बाबालाही १६ हजार महिलांची संगत हवी असे तो म्हणतो. एकदा का आश्रमात दाखल झाल्या की या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात येत  होते. कोर्टाने त्याच्या तपासाचे आदेश दिले होते. जेव्हा मुलीना बाहेर काढले तेव्हा त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर आत्यचार झाले असे समोर आले आहेत. लवकरच याबबावर कारवाई होणार आहे.