गजानना गुणागरा परम मंगला पावना ।
	अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।।
	नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा ।
				  													
						
																							
									  
	करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।
	 
	निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी ।
	तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी ।
				  				  
	विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वांसरा ।
	करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।।
	 
	अलास जगीं लावण्या परतुनी सु-वाटे जन ।
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	समर्थ गुरूराज ज्या भुषवि नाम नारायण ।।
	म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा ।
	करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।।
				  																								
											
									  
	 
	क्षणांत जल आणिले नसून थेंब त्या वापिला ।
	क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा ।
				  																	
									  
	क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा ।
	करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।।
	 
				  																	
									  
	अगाध करणी तुझी गुरूवरा, न लोकां कळे।
	तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे ।
	कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा ।
				  																	
									  
	करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।।
	 
	समर्थ स्वरूपप्रती धरून साच बाळापूरी ।
	तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरी ।
				  																	
									  
	हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा ।
	करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।६।।
	 
	सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां ।
				  																	
									  
	जलांत बुडतां तरी तिजसी नर्मदा दे हाता ।
	अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा ।
	करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।७।।
				  																	
									  
	 
	अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितो ।
	पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ।
	तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा ।
				  																	
									  
	करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।८।।