संबंधित माहिती
- मनोज जरांगे यांनी सरकारची विनंती धुडकावली, पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात
- मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटील आज पासून आमरण उपोषणाला बसणार
- मराठा आरक्षणाचा वाद चिघळणार?
- कायद्याच्या कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण आम्ही देऊ, असेही देवेंद्र फडणवीस
- मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार अडचणीत, मनोज जरांगे यांनी नव्या जाहिरातीवर प्रश्न उपस्थित केले
मराठा आरक्षणासाठी २१ वर्षीय युवकानं मृत्यूला कवटाळलं
सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सरकारदेखील मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक असून कोणी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. तरीही तरूण आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. अशातच बीड मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बीडमधील शहाजानपूर लोणी गावात एका २१ वर्षीय मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. अशोक मते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या का करत आहोत, याचे कारण त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सांगितलं.
अशोक मते याने स्वतःच्या शेतात आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी झाडावरून मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर त्यांना अशोकच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात सरकार मराठा आरक्षण देत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिला होता. याविषयीची माहिती नातेवाईकांनी दिलीय. मराठा आरक्षणासाठी त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
खिशामध्ये चिठ्ठी सापडली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. तपासाचा भाग असल्याने चिठ्ठीमध्ये काय आहे? हे सांगू शकत नाही, असं पिंपळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश भारती यांनी सांगितले. अशोक मते याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
