बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 27 जून 2021 (17:52 IST)

घरातून काही न खाता निघत असाल तर याचे होणारे नुकसान जाणून घ्या

बऱ्याच वेळा आपण कामाच्या ताणामुळे काहीही न खातापिता बाहेर निघून जातो.या नंतर कामात असल्यावर जोरात भूक लागू लागते.जर आपण काही ही न खाता घरातून बाहेर पडता तर या मुळे आपल्या आरोग्यास  नुकसान होऊ शकत.चला तर मग जाणून घेऊ या .
 
 
1 ऍसिडिटी- जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे पोटात गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ लागतो.ही समस्या जास्त झाल्यास हृदयावर त्याचा प्रभाव पडतो. म्हणून नेहमी घरातून काही खाऊनच बाहेर पडावे.जेणे करून भूक लागून खाण्यासाठी भटकंती करण्याची गरज भासू नये.
 
2 अस्वस्थता जाणवणे-काही लोक असे असतात ज्यांना भूक सहन होत नाही. तरी ही ते घरातून काही ही न खाता बाहेर पडतात.बऱ्याच वेळा अचानक भूक लागते.काही ही न खाल्ल्यामुळे अस्वस्थता जाणवते.मळमळु लागते.म्हणून घरातून नेहमी काही खाऊनच बाहेर पडावे.
 
3 उष्माघात होणं- बऱ्याचवेळा काही आवश्यक काम असल्यावर घरातून बाहेर हा विचार करून पडतो की आल्यावर काही खाऊन घेऊ. परंतु त्या दिवशी याचा प्रतिकूल प्रभाव पडतो आणि उष्माघाताचा त्रास होतो.काही लोकांना या उष्माघातामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 
 
4 रक्तदाब कमी होणे-रिकाम्या पोटी बाहेर पडल्यावर आपले रक्तदाब देखील कमी होऊ शकते.बरेंच लोक पाणी पिऊन आपली भूक भागवतात. परंतु शरीरास पाण्यासह कॅलरीची गरज पडते.म्हणून केवळ पाण्याने आपली भूक भागवू नका.
 
5 बेशुद्ध होणे-बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की लोक उभे असताना बेशुद्ध होतात कारण रिकाम्या पोटी असल्याने त्यांच्या मध्ये अशक्तपण येतो. अशा परिस्थितीत शरीराला फायबर आणि कार्ब्स ची आवश्यकता असते.