1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 27 मे 2025 (19:23 IST)

विरोधकांना चोख उत्तर देताना अमित शहा म्हणाले मोदींनी देशाला चौथ्या क्रमांकावर आणले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा मंगळवारी संपला. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी शाह यांनी मुंबईत काही कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी माधवबाग येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षातील कामगिरीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना चोख उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अनेक समस्या सोडवता आल्या नाहीत, परंतु पंतप्रधान मोदींनी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दाखवून ही कामे पूर्ण केली. मोदींनी देशाला दहाव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आणले.केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, कालच पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान म्हणून ११ वर्षे पूर्ण केली. गेल्या ११ वर्षांपासून ते देशाच्या विकास प्रवासाला पुढे नेत आहे. पंतप्रधान मोदींनी असे काम केले आहे की आपल्याला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. 
तसेच यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, माधवबाग ट्रस्टचे मान्यवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
Edited By- Dhanashri Naik