जबलपूर विमानतळावर बॉम्ब ठेवण्याची धमकी
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती, परंतु चौकशीनंतर ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अतिरिक्त एसपी सूर्यकांत शर्मा यांनी सांगितले की, जबलपूरच्या दुमना भागातील विमानतळाच्या अधिकाऱ्यांना रविवारी एक ईमेल मिळाला होता, ज्यामध्ये विमानतळावर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर विमानतळ रिकामा करण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला.
ते म्हणाले की, तपासात असे दिसून आले आहे की हा ईमेल एकाच वेळी 40 ते 41ठिकाणी पाठवण्यात आला होता. असे दिसते की एखाद्या खोडसाळ घटकाने हे केले आहे. माहिती मिळताच, दहशतवादविरोधी पथक (एटीएस), श्वान पथक, स्थानिक पोलिस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने विमानतळावर शोध मोहीम राबवली. परंतु तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. यानंतर, सर्व उड्डाणे वेळेवर सुरू करण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की, विमानतळावर सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे आणि आता परिस्थिती सामान्य आहे.
अज्ञात आरोपीला पकडण्याची जबाबदारी सायबर सेलकडे देण्यात आली आहे. आम्ही सर्व माहिती गोळा करत आहोत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. विमानतळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून, खमारिया पोलिसांनी भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 351 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Edited By - Priya Dixit