1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Aditya Thackeray strongly criticizes the central government

आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका: "संविधानातील हस्तक्षेप लोकशाहीसाठी मारक," महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत फेटाळल्यानंतर पोस्ट व्हायरल

आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका:
शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी म्हटले की, मतदारसंघ पुनर्रचनेचा समावेश असलेला हा कायदा, राज्यांचा आवाज दाबण्यासाठी तयार केलेले एक राजकीय साधन आहे. 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये ठाकरे यांनी दावा केला की, या विधेयकामुळे सत्ताधारी सरकारला जागा वाढवण्यासाठी, अनेक राज्यांचा आवाज दाबण्यासाठी आणि खोटा विजय मिळवण्यासाठी मतदारसंघांमध्ये फेरफार करण्याकरिता राजकीय डावपेच खेळता येतील.
 
तसेच विधानसभा व लोकसभेत महिलांना ३३% आरक्षण देण्यासोबत लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवणारे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताअभावी फेटाळले गेल्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
 
आदित्य ठाकरेंचे मुख्य विधान 
“केंद्र सरकारने राजकीय हेतूने संविधानात दुरुस्ती करून लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवणारे, अनेक राज्यांचा आवाज दाबणारे आणि गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठी मतदारसंघांची फेररचना करण्याचा प्रयत्न करणारे मांडलेले विधेयक, काल संसदेत पराभूत झाले. संविधानातील हा हस्तक्षेप भारतातील लोकशाहीसाठी पर्यायाने संविधानाकरताही मारक ठरला असता, पण हा प्रयत्न विरोधी पक्षाच्या खासदारांच्या एकजुटीमुळे फेटाळण्यात आला.”
 
ते पुढे म्हणाले २०२३ चा महिला आरक्षण कायदा आधीच मंजूर झाला आहे. त्याची अधिसूचना १६ एप्रिल २०२६ रोजी जारी झाली. सध्याच्या ५४३ जागांमध्येच ३३% महिला आरक्षण तात्काळ लागू करा. आजचे विधेयक “गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक” होते. २०२९ च्या निवडणुकीसाठी सध्याच्या जागांवरच आरक्षण लागू करणे गरजेचे आहे.
 
केंद्र सरकारने १३१वी घटनादुरुस्ती व मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांना जोडून महिलांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. दक्षिण भारतातील राज्ये याला विरोध करत आहे, कारण त्यामुळे उत्तर भारतातील जागा वाढतील आणि दक्षिणेकडील प्रतिनिधित्व कमी होईल.
ही घटना महाराष्ट्र राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. विरोधक सरकारवर “संविधान हायजॅक” आणि “राजकीय फायद्यासाठी महिलांचा वापर” असा आरोप करत आहे, तर सत्ताधारी पक्ष आरक्षणाच्या बाजूने उभा आहे.
 
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'भाकरी फिरवणार'; खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांची सुट्टी होण्याची शक्यता, शिवसेनेच्या हालचालींना वेग