1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 मार्च 2023 (17:34 IST)

आईनं गळफास घेऊन तर 2 तरुण मुलींनी विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

death
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका धक्कादायक घटनेत आईसह दोन तरुण मुलींनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ही घटना मन्याळे गावात घडली आहे. सुनिता अनिल जाधव (वय 48) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर त्यांच्या मुली प्राजक्ता जाधव (वय 22) आणि शितल जाधव (वय 18) या दोन्ही बहिणींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
 
एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येने परिसर हादरून गेलं आहे. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.
 
आईने आत्महत्या केल्यानंतर मुलींनी जीवन संपविल्याचा अंदाज बांधला जात आहे तरी तिघींच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.