औरंगजेब आवडो किंवा न आवडो त्याची कबर एक संरक्षित स्मारक आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान समोर आले
Maharashtra News: महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात औरंगजेबाच्या कबरवरून हिंसक संघर्ष झाला. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. आता, औरंगजेबाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे एक नवीन विधान समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, लोकांना मुघल सम्राट औरंगजेब आवडो किंवा न आवडो, त्याची कबर एक संरक्षित स्मारक आहे. कोणालाही त्याचे गौरव करण्याची परवानगी दिली जाणार नाही. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, "कायद्याच्या कक्षेबाहेर असलेली" बांधकामे काढून टाकली पाहिजेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरात असलेले १७ व्या शतकातील मुघल शासकाचे कबर हटवण्याची मागणी काही संघटना करत आहे.
गरज असेल तिथे मराठी भाषा वापरली पाहिजे
तसेच बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीबद्दल विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जिथे अपेक्षित आहे तिथे मराठी भाषेचा वापर केला पाहिजे आणि त्यात काहीही चुकीचे नाही. तथापि, कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले.
नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू
मुख्यमंत्री म्हणाले की, २०२७ च्या नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी आणि नद्यांच्या स्वच्छतेसाठी सरकारने काही मोहिमा सुरू केल्या आहे. ते म्हणाले की, 'आम्ही काही मोहिमा सुरू केल्या आहे, पण या कामांना वेळ लागतो. महानगरपालिका, परिषदा, शहरे आणि उद्योगांमधून निर्माण होणारा कचरा नद्यांमध्ये सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. आम्ही प्रक्रिया केंद्रांच्या स्थापनेला पाठिंबा देतो. कुंभमेळा सुरू झाल्यावर पवित्र स्नानासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होईल.
Edited By- Dhanashri Naik