संबंधित माहिती
- मुंबईत बनावट जन्म दाखल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश, महत्त्वाची कागदपत्रे गहाळ, एसआयटी तपास सुरू
- नागपुरात २० हजार रुपयांच्या वादातून नातवाने आजीची निर्घृण हत्या केली, आरोपीला अटक
- छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग चौथ्या दिवशी पेट्रोल पंपांवर 'साठा नाही' असे फलक
- आज ६ जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेचा रेड-ऑरेंज अलर्ट, १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
- नागपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर? ८ दिवसांत २६ संशयास्पद मृत्यूं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज शिर्डी दौरा; रेल्वे प्रवासाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिर्डी दौऱ्यावर असून, त्यांच्या या प्रवासाची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. एक विशेष पाऊल उचलत मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेहमीच्या ताफ्याऐवजी रेल्वेने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून रेल्वेने शिर्डीसाठी रवाना झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच लोकप्रतिनिधींना आणि सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरणपूरक प्रवासासाठी आणि जनतेशी थेट जोडले जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.
????CM Devendra Fadnavis arrives at Shirdi, Ahilyanagar.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 23, 2026
????मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी, अहिल्यानगर येथे आगमन.
????मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका शिर्डी, अहिल्यानगर में आगमन।
???? 11am | 23-5-2026????Shirdi, Ahilyanagar | स. ११ वा. | २३-५-२०२६????शिर्डी, अहिल्यानगर.… pic.twitter.com/86Kf2SC6wc
आपल्या या शिर्डी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध विकासकामांचा आढावा घेणार असून स्थानिक प्रशासनासोबत बैठका घेण्याचीही शक्यता आहे. याशिवाय, त्यांच्या हस्ते 'निबे ग्लोब' या डिफेन्स फॅक्टरीचे (संरक्षण कारखाना) उद्घाटन देखील केले जाणार आहे.
मुख्यमंत्री रेल्वेने प्रवास करणार असल्यामुळे रेल्वे प्रवासी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विविध रेल्वे स्थानकांवर कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली असून रेल्वे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे.
