संबंधित माहिती
- बच्चू कडू यांचा इशारा: दिव्यांग आणि दृष्टिहीन बांधवांच्या थकीत मानधनाचा १९ मे पर्यंत प्रश्न न सुटल्यास मंत्रालयात आंदोलन करणार
- इंदापूर शेतकरी आंदोलन: पाणी प्रश्नावरून इंदापूरचे शेतकरी आक्रमक; १० मे पासून कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करणार
- 10th results कमी गुणांमुळे तणावाखाली येऊन विद्यार्थ्यांची आत्महत्या; धाराशिव मधील घटना
- पुण्यात पतीसोबत झालेल्या भांडणानंतर इमारतीच्या आठव्या मजल्या वरून उडी घेऊन पत्नीची आत्महत्या
- मुंबईत मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांसाठी भाजपची मराठी शाळा, विशेष दोन पानी माहितीपुस्तिकेचे वाटप
हवामान विभागाने आज महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता
हवामान विभाग (IMD) ने आज महाराष्ट्रातील एकूण १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. राज्यात हवामानाचे दुहेरी स्वरूप दिसत आहे
विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, गडगडाट आणि जोरदार वारे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही पूर्व-मान्सून क्रियाकलाप वाढल्याचे लक्षण आहे. पुढील २-३ दिवसांतही काही भागांत असेच वादळी पावसाचे प्रमाण राहू शकते.
तसेच मे महिन्याच्या कडक उन्हात असा अचानक येणारा पाऊस आणि वादळ शेतीसाठी आणि आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतं. दुपारनंतर किंवा संध्याकाळी ढग दाटून येऊन वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारा पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
प्रभावित क्षेत्र: प्रामुख्याने विदर्भ (नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर इ.) आणि मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर इ.)
जरी पाऊस पडणार असला, तरी आर्द्रतेमुळे दिवसा उकाडा अधिक जाणवू शकतो. पाऊस पडून गेल्यानंतर थोडा काळ गारवा जाणवेल, पण त्यानंतर पुन्हा उष्णता वाढण्याची शक्यता असते.
Edited by-Dhanashri Naik
