1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जून 2025 (10:44 IST)

एकनाथ शिंदे यांचा शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

uddhav eknath
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की उद्धव सत्तेसाठी लाचार झाले असून त्यांनी हिंदुत्त्व सोडले आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी प्रतारणा केली. ते सत्तेसाठी अगतिक,लाचार झाले आहे. 
2019 मध्ये त्यांनी मराठी माणसांचा विश्वासघात केला. त्यांनी सरड्यासारखे रंग बदलले आहे. सरडा देखील रंग बदलतो मात्र इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला आहे. अशी घणाघात टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 
एकनाथ शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे) सोबत युती करण्यास तयार आहेत, यावरून असे दिसून येते की ते फक्त सत्तेसाठी काहीही करू शकतात. शिंदे यांनी टोमणा मारला की, 'ते आता युतीसाठी घरोघरी फिरत आहेत'.
एकनाथ शिंदे यांनी दावा केला की खरी शिवसेना तीच आहे ज्याला धनुष्यबाणाचे निवडणूक चिन्ह आहे आणि जनतेचा पाठिंबा आहे. 'आम्ही बाळा साहेबांच्या हिंदुत्व विचारसरणीची काळजी घेतली आहे, तर त्यांनी (उद्धव) ती सोडून दिली'. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला (यूबीटी) जे काही मते मिळाली ती काँग्रेसमुळेच होती, खरे शिवसैनिक त्यांना सोडून गेले आहेत, असे ते म्हणाले.
Edited By - Priya Dixit