महाराष्ट्रात वीज स्वस्त होणार: १ एप्रिलपासून दरात १० ते १४ टक्क्यांची कपात, ग्राहकांना दिलासा
महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीज दरात १० ते १४ टक्क्यांनी कपात होणार आहे. सर्व स्लॅबमधील या कपातीमुळे घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांची वीज बिले कमी होतील.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला उन्हाळ्याच्या हंगामात मोठा दिलासा मिळणार आहे. १ एप्रिलपासून वीज दरात १० ते १४ टक्के कपात लागू होणार असून, त्यामुळे ग्राहकांचा मासिक खर्च कमी होईल.
नवीन दरांनुसार, वीज वापराचे सर्व चार टप्पे कमी करण्यात आले आहेत. ० ते १०० युनिट्ससाठीचा दर ₹४.७६ वरून ₹४.३०, १०१ ते ३०० युनिट्ससाठीचा दर ₹७.९६ वरून ₹७.१०, ३०१ ते ५०० युनिट्ससाठीचा दर ₹१३.५५ वरून ₹११.६४ आणि ५०० युनिट्सपेक्षा जास्त वापरासाठीचा दर ₹१४.५५ वरून ₹१२.६४ पर्यंत कमी करण्यात आला आहे.
हा निर्णय विद्युत नियामक आयोगाने घेतला आहे. महावितरण , अदानी, बेस्ट आणि टाटा यांसारख्या वीज वितरण कंपन्यांच्या प्रस्तावांच्या आधारे नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत . याचा राज्यातील सर्व प्रवर्गातील घरगुती ग्राहकांना थेट फायदा होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार स्थापन करताना वीज दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. ऊर्जा विभागाचा कार्यभार सांभाळत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना दर कमी करण्याचे निर्देश दिले होते.
उन्हाळ्यात विजेचा वापर वाढल्यामुळे बिले सामान्यतः वाढतात. दरांमधील ही कपात ग्राहकांसाठी दिलासादायक असून, त्यामुळे घरगुती खर्चावरील ताण कमी होईल.
वीज दरातील या कपातीमुळे केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच दिलासा मिळणार नाही, तर लहान व्यवसाय आणि मध्यमवर्गाला फायदा होऊन राज्याच्या आर्थिक घडामोडींवरही सकारात्मक परिणाम होईल.
Edited By - Priya Dixit