1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Mumbai rain

पावसाने केली समुद्रकिनारी असेलेली सुरुची झाडांची बाग उध्वस्त

mumbai rain

प्रसिद्ध असलेला आणि  पालघर येथील  केळवे बीच, चिंचणी या समुद्रकिनारी  पावसानं अक्षरश: थैमान घातले आहे. यामध्ये पाऊस इतका भयानक होता की यात आलेल्या  वादळात, केळवे बीच भागातली सुरुची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. ही प्रसिद्ध बाग आहे. या बागेची स्थिती पहिली तर लक्षात येते की पावसाचा जोर किती असेल.

अविरतपणे कोसळणाऱ्या पावसामुळे ही बाग उद्धवस्त झाली आहे.   पालघर ,विरारमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे विरार  स्टेशनबाहेर अक्षरश: गुडघाभर पाणी साचलं  आहे.त्यामुळे मुंबईकर वैतागले असून अनेक ठिकाणी रेल्वे बंद आहे. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईमध्येहीकोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडतो आहे.

पुढील लेख
बाबाच्या डेऱ्यात सापडले ६०० गाडलेले मृतदेह