संबंधित माहिती
- सुनेत्रा पवार यांची निर्णायक आघाडी, आज ठरणार बारामतीचा निकाल! शेवटच्या क्षणी गेम पलटणार?
- By-election Results: बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर तर राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कार्डिले आघाडीवर
- मालवणमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका; सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडले
- इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची मांदियाळी; राजकीय वर्तुळात चर्चा
- Baramati and Rahuri By-Election Result मतमोजणीला सुरुवात, महायुती की महाविकास आघाडी? संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे
राज्यातील ११ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; विदर्भात 'यलो' आणि 'ऑरेंज' अलर्ट
मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात हवामानाचे दोन टोकाचे पैलू पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मुंबई, पुणे आणि कोकणात उष्णतेची लाट असताना, दुसऱ्या बाजूला विदर्भासह काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
११ जिल्ह्यांना अलर्ट: भारतीय हवामान विभागाने (IMD) ४ मे रोजी राज्यातील एकूण ११ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये सात जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' तर चार जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
वादळी वारे आणि वीज: या पावसाळी वातावरणात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
विदर्भातील स्थिती: अमरावती विभागात (अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ) मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे विदर्भातील काही भागांत तापमान ४१ ते ४४ अंश सेल्सिअस असतानाच पावसाचे आगमन होणार आहे.
कोकण आणि मुंबई: विदर्भात पावसाचे सावट असले तरी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात हवामान उष्ण आणि दमट राहणार आहे. येथील कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र: पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांना उन्हापासून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याच्या काही भागात कडाक्याचे ऊन आणि काही भागात वादळी पावसाचा तडाखा असे संमिश्र वातावरण पाहायला मिळणार आहे.
