संबंधित माहिती
- मुंबईत 10 जुलैपर्यंत कलम 144 लागू
- 'शिवसेना-बाळासाहेब', एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं
- संजय राऊतांचा बंडखोरांना सल्लाः स्वत:ला वाघ मानता ना, मग बकरीसारखं बें बें करू नका
- 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड साजिद मीर जिवंत, ISI ने मृत्यूचा दावा केला होता
- इंदोरीकर महाराजांचे राजकराणावर किर्तन, ची एकनाथ शिंदेंच्या बंडावर तुफान वक्तव्य
शिंदे यांनी केला आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप
एकनाथ शिंदे यांनी एक नवं ट्विट करत खळबळ उडवून दिलीय. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी राजकीय आकसापोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला. तसेच या शिवसेना आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे, या गोष्टीकडेही त्यांनी ट्विटमधून लक्ष वेधले आहे.
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
