संबंधित माहिती
- 'केतकी चितळेच्या पोस्टमध्ये शरद पवार यांचा उल्लेख आढळत नाही' - तृप्ती देसाई
- प्रसिद्ध असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठात तब्बल 50 कोटी रुपयांचा घोटाळा
- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भाजपचं योगदान काय?
- केतकी चितळेवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल, आता गृहमंत्री म्हणाले...
- बारामतीच्या विकासाबाबत झाकली मूठ सव्वा लाखाची - अजित पवार
शिवसेना सत्ता लंपट आहे' - गिरीश महाजन
"शिवसेनेची सभा म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न. विधानसभेला युती नसती तर शिवसेनेचे 25 आमदारही निवडून आले नसते," अशी टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
'शिवसेना म्हणजे गटारातील बेडूक आहे,' असंही महाजन म्हणाले. शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शनिवारी जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, "त्यांनी मतदारांनी उत्तर दिलं आहे. 10 वर्षांपासून देत आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात मोठा झाला. सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. आमची युती झाली होती. पण आज काय परिस्थिती आहे. आम्हाला जनतेनं सर्वाधिक जागा दिल्या. मोदींवर यांना बोलण्याची गरज नाही. यांची लायकी आहे का?" अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.तसंच शिवसेना सत्ता लंपट असून त्यांनी स्वबळावर 4 खासदार निवडून आणावेत असंही महाजन म्हणाले.
