1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. 4 buffaloes, 250 chickens burnt to death in the fire

4 म्हशी, 250 कोंबड्या आगीत जळून ठार

वडवणी तालुक्यातील बावी तांडा परिसरात ही आगीची घटना घडली आहे. 33 केव्हीची विद्युत तार तुटून दामू राठोड आणि शेषेराव राठोड यांच्या तब्बल 13 एकर ऊस जळून खाक झाला असून प्रल्हाद आडे यांचाही गोठा जळून खाक झालाय. तसेच 4म्हशी आणि 250 कोंबड्याांचाही मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासह संसार उपयोगी साहित्य वाचवण्यासाठी शेतकरी कुटुंबाची अक्षरश: धावपळ झाली होती. 
  
 या महिनाभरात महावितरणचा कारभाराने अनेक तालुक्यांमध्ये कित्येक एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये अनेकांचा जीवदेखील यामध्ये गमवावा लागला आहे.
पुढील लेख
IPL 2022: IPL नवीन हंगामात या नियमांनुसार खेळले जाईल, झाले मोठे बदल