संबंधित माहिती
- मी संजय राऊतांचे काय हाल करेन : संजय गायकवाड
- शिवसृष्टी आशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
- Tripura Election 2023: 'पूर्वी ईशान्य बॉम्बस्फोटांनी हादरायचे, आता विकासाचा आवाज येतो -अमित शाह
- 2024 मध्ये मोदी-शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही- प्रकाश आंबेडकर
- Rahul Gandhi: 'पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हिंसाचाराला भडकावतात', राहुल गांधींनी श्रीनगरमध्ये भाजप-आरएसएसला फटकारले
ते महाराष्ट्राच्या राजकारणातून जवळपास गायब झाले आहेत
शिवसेना नाव आणि पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गट आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. यातच आता मिस्टर इंडिया चित्रपटातील डायलॉग वापरुन भाजपने "मिस्टर इंडिया गायब झाला" म्हटले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे खलनायक वर्णन करत मोगॅम्बो खुश झाला असे म्हटले होते. त्यावर आता भाजपने उद्धव यांना त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईतील भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव यांच्यावर प्रत्युत्तर देताना म्हटले की, ते स्वतः मिस्टर इंडिया बनत आहेत. ते महाराष्ट्राच्या राजकारणातून जवळपास गायब झाले आहेत. उद्धव ठाकरे भाजप नेतृत्वाला मोगॅम्बो म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांना गोष्टी समजत नाहीत, तेच असे मूर्खासारखे भाष्य करतात, अशी टीका त्यांनी केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor
