संबंधित माहिती
- पुराचा कहर! पेणमध्ये हजारो गणेश मूर्ती पाण्यात विरघळल्याने शिल्पकारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
- रायगडमध्ये धोका! मुसळधार पावसामुळे ३,००० गॅस सिलिंडर वाहून गेले
- आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ दरीत कोसळली; साताऱ्यातील ८ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
- रायगड जिल्ह्यातील पेण परिसराला 'तिसरी मुंबई' बनवण्याची तयारी सुरू
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का, शिंदे सेनेने रायगडमधील 'तटकरेंचा बालेकिल्ला' भेदला
पर्यटनाचा आनंद बेतला जीवावर! देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाल्याची धक्कादायक घटना
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. देवकुंड धबधब्यावर दोन पर्यटक बुडाल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचाव पथकांना पाचारण करण्यात आले आहे.
पोलिसांची उपस्थिती असूनही पर्यटक धबधब्यापर्यंत कसे पोहोचले?
मिळालेल्या माहितीनुसार, माणगावच्या देवकुंड धबधब्यावर आणि इतर पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी असूनही, पर्यटकांची गर्दी धबधब्याकडे होत आहे. पोलिसांचे संरक्षण असूनही पर्यटक धबधब्यापर्यंत कसे पोहोचले? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मुंबई गुन्हे शाखेने बनावट पोलीस अधिकारी आणि डॉक्टरला अटक केली; २८ वर्षांपासून लोकांची फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील चाकणहून २१ जणांचा एक गट पावसाळी पर्यटनासाठी रायगडच्या माणगाव येथील देवकुंड धबधब्याला भेट देण्यासाठी आलेला होता. त्यामधील दोन तरुण धबधब्यात बुडून मरण पावले. हे दोन्ही तरुण पुणे जिल्ह्यातील चाकण भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. १२ जुलै रोजी, चाकण येथील २१ जणांच्या गटातील गोपाल रामराव राठोड (२४) आणि विष्णू धोक (२३) हे देवकुंड धबधब्यात पोहण्यासाठी आणि भेट देण्यासाठी आले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्यामुळे हे दोन्ही तरुण खोल पाण्यात वाहून गेले. रविवारी दुपारी हा अपघात घडला. पोलिसांची उपस्थिती असूनही पर्यटक धबधब्यापर्यंत कसे पोहोचले?
मिळालेल्या माहितीनुसार, माणगावच्या देवकुंड धबधब्यावर आणि इतर पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी असूनही, पर्यटकांची गर्दी धबधब्याकडे होत आहे. पोलिसांचे संरक्षण असूनही पर्यटक धबधब्यापर्यंत कसे पोहोचले? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
