1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 6 जून 2024 (14:51 IST)

संजय राऊत असे का म्हणाले? मोदीजींनी पद सोडायला हवे

sanjay raut
शिवसेना युबीटी नेते संजय राऊत म्हणाले की, मोदीजींनी पद सोडायला हवे. कारण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली गेली आहे. महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस यांना हरवले आहे. महाराष्ट्रात भाजपाची कामं त्यांच्या हातात होती. देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या सिटांना 23 वरून 9 पर्यंत आणण्यासाठी जवाबदार आहे. मोदीजी मोठे नेते आहे. आम्ही त्यांच्या समोर खूप छोटे आहोत. त्यांनी सरकार बनवावी. 
 
यापूर्वी संजय राऊत यांनी जबाब दिला होता की, मी वारंवार सांगत आहे की, मोदींची सरकार बनणार नाही आणि बनली तरी टिकणार नाही. ते म्हणाले की पिक्चर अजून बाकी आहे. 
 
यापूर्वी ते म्हणाले होते की, जर राहुल गांधी इंडिया युतीचे पीएम चेहरा बनले तर आम्हाला काहीही अडचण नाही. आम्ही सर्व त्यांच्यावर प्रेम करतो. पंतप्रधान कोण होतील. या प्रश्नावर इंडिया युतीमध्ये कोणताही मतभेद नाही. 
 
NDA च्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींना सर्वसन्मानित नेता निवडले गेले आहे. मोदी एनडीए संसदीय दलची बैठक नंतर शुक्रवारी राष्ट्रपती यांच्या समोर सरकार बनवण्याचा दावा सादर करणार आहे. 
 
नवीन सरकारमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू केंद्रामध्ये किंगमेकर यांच्या भूमिकेमध्ये आले आहे. दोघांनी मोदींना समर्थन दिल्याचे घोषित केले आहे. नितीश कुमार यांच्या बद्दल बोलले जाते आहे की, ते राजनीतीमध्ये कोणाचेच सख्ये नाही. कधी पण मन बदलू शकते.