संबंधित माहिती
- भाजपला माहिती आहे की बारामतीत आपण जिंकू शकत नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला
- "राज्याला 2 मुख्यमंत्र्यांची गरज; एक कार्यक्रमाला जातील, दुसरे..."-सुप्रिया सुळे
- ठाकरे गट हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतचा एक गट-राहुल शेवाळे
- संभाजीनगर’ नामांतरण विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ९ शहरांमध्ये होणार लॉजिस्टिक पार्क; असा होणार फायदा-उदय सामंत
छापेमारी का केली? पुरावे द्या- प्रकाश आंबेडकर
एनआयएने 22 सप्टेंबर रोजी देशभरात अचानक पीएफआय या भारतविरोधी कारवाईचा आऱोप असलेल्या संघटनेवर छापेमारी करुन मोठी कारवाई केली. या छापेमारीमुळे देशभरात विविध नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही कारवाई करणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांना आव्हान दिलं आहे.
ते म्हणाले, "या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय पुरावे होते? आणि आपण जे कागदपत्रे गोळा केलेले आहेत, ती नेमकी कोणती आहेत? त्यांच्याकडे किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या 24 तासात लोकांसमोर मांडावं."
पुढील लेख
