स्वामी माझा कृपानिधी
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
MHNEWS |
तो म्हणजे तोच. आपल्या या सगळ्या बोलण्या, लिहिण्या, वाचण्यामागचा सूत्रधार तो एकच आहे. फक्त एवढेच की तो कृपेचा सागर आहे.
त्यामुळे होते काय की काही झाले करी शेवटी आपल्याला त्याचाच आधार आहे, ही आमच्या मनातील श्रद्धा आणखी दृढावते आणि अशा त्या आमच्या स्वामीरायाला, आमच्या मालकाला, आमच्या सूत्रधाराला आम्ही श्रीविठ्ठल म्हणून गौरवितो. त्याच्या नावाचा जयजयकार करतो. जयहरी विठ्ठल असे म्हणतो.
