संबंधित माहिती
- पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये ‘आझादी’साठी मोर्चा सैन्याने LOCजवळ रोखला
- सौदी अरेबियात अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची परवानगी
- आरे : सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश - आरे कॉलनीतील झाडांची कत्तल थांबवा
- आरे : मुंबई मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड सुरू, परिसरात जमावबंदी लागू; शिवसेनेचा ट्विटरवरून विरोध
- पशु-पक्ष्यांचा बळी देणं धार्मिक अधिकार नाही
महात्मा गांधींना रिटायर करा - तुषार गांधी
"देशाला नवीन 'राष्ट्रपिता' मिळाले असतील तर गांधीजींना रिटायर करण्याची वेळ आली आहे," असं वक्तव्य लेखक आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केलं आहे.
"मध्य प्रदेशातील रेवा आश्रमातून महात्मा गांधींच्या अस्थी चोरण्यात आल्या आहेत. तसंच त्यांच्या फोटोखाली 'गद्दार' लिहिण्यात आलं आहे. या घटनेला 3 दिवस झाले आहेत. देशाला नवीन 'राष्ट्रपिता' मिळाले असतील तर गांधीजींना रिटायर करण्याची वेळ आली आहे," अशी टीका तुषार गांधी यांनी केली आहे.
'गांधी : माणूस ते महात्मा' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभादरम्यान औरंगाबादेत ते बोलत होते. गांधीजींच्या अस्थीचोरीच्या घटनेबाबत राजकीय पक्ष, गांधीवादी संस्था आणि प्रसारमाध्यमांनी मौन बाळगलंय, असा आरोप त्यांनी केला.