संबंधित माहिती
- मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून सुट्टी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासियांशी संवाद साधणार
- मनमोहन सिंग यांना आलेल्या 'त्या' फोनमुळे भारताचं भविष्य असं बदललं
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला देशातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
- १५ रेल्वे गाड्या उद्यापासून अंशतः सुरू होणार, आज ४ वाजल्यापासून ऑनलाइन बुकिंग करा
मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधत आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. यासाठी मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन पुढे वाढवला जाणार असल्याची घोषणा केली.
हे पॅकेज सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी असून अर्थमंत्री यांच्याकडून आत्मनिर्भर भारत अभियानाची विस्तृत माहिती दिली जाईल असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं आहे.
दरम्यान त्यांनी जगात ४२ लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले असून पावणे तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका व्हायरसने संपूर्ण जगाचं नुकसान केलं आहे. असं संकट ना कधी पाहिलं ना ऐकलं आहे. हे संकट खूप मोठं संकट असल्याचे म्हटले.
पुढील लेख