संबंधित माहिती
- शिर्डीच्या कॉंग्रेस उमेदवाराची कोट्यावधीची संपत्ती, शिक्षण फक्त दुसरी पास
- काँग्रेस पक्षामध्ये आत्मविश्वासाचा अभाव - उद्धव ठाकरे
- कासाची वल्गना करणारे लवकरच गायब होतील - संग्राम जगताप
- आता काय पार्थला फासावर देणार का ? - अजित पवार
- धान्य पिकवणाऱ्याच्या मालाला योग्य किंमत दिली नाही, तर परदेशातून धान्य आणावे लागेल - खा. शरद पवार
युती झाल्यानंतरही जे पटणार नाही त्याला विरोधच - आदित्य ठाकरे
कर्जमाफी, नाणार प्रकल्प या संदर्भात उत्तरं मिळाल्यामुळे भाजपशी पुन्हा युती करण्यात आली. परंतू युती झाल्यानंतरही जे पटणार नाही त्याला विरोध करण्यात येईल, असं युवासेनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे रविवारी एका कार्यक्रमात म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघातील युवकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आदित्य संवाद नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एकमेकांशी कायम भांडत राहिलात तरीही युती का केली असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
देशाची सध्याची परिस्थिती पाहता सध्या युती करणं गरजेचं होतं. पण नोटाबंदीच्या निर्णयामुळे कुणाचाच फायदा झाला नाही, असंही ते म्हणाले.