Rani Durgavati Information गोंडवानाची वीरांगना राणी दुर्गावती
Rani Durgavati : भारतात अनेक महान राजे आणि वीरांगना होऊन गेले आहे. सर्वांनी या भारतभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. तशीच एक महान, धाडसी वीरांगना म्हणजेच गोंडवानाची राणी दुर्गावती होय. ज्यांना अकबर सारखा बलाढ्य शत्रू देखील घाबरला होता. गोंडवानाची राणी दुर्गावती यांच्या शौर्याबद्दल आणि धाडसाबद्दल आज देखील अभिमानाने बोलले जाते. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मुघलांशी लढा देत आपले प्राण भारतभूमीला अर्पण केले.
गोंडवानाची राणी दुर्गावती यांचा इतिहास आपल्याला अनेक प्रेरणा देतो. त्या एक धाडसी वीरांगना तर होत्याच ज्यांनी मुघल शासक अकबराच्या सैन्याला धूळ चारली होती. राणी दुर्गावती यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मुघलांशी लढत आपले प्राण अर्पण भारतभूमीला केले. जेव्हा राणी दुर्गावतीला वाटले की ती आता युद्ध जिंकू शकणार नाही आणि आपण जखमी झालो आहोत, तेव्हा त्यांनी स्वतःच्या खंजीरने स्वतःच्या छातीत वार करून घेतले. पण शत्रूच्या हाती स्वतःला लागू दिले नाही. त्यांचे हे बलिदान आज देखील भारतवर्षात आठवले जाते.
तसेच भारतातील मध्य प्रदेशची भूमी अजूनही राणी दुर्गावतीच्या आठवणी जपते, जिथे त्यांनी मुघलांना पराभूत केले होते. आजही, गोंडवाना प्रदेशात त्यांचे शौर्य आणि धैर्य तसेच त्यांनी केलेल्या जनहिताच्या कामांसाठी त्यांचे स्मरण केले जाते. राणी दुर्गावती यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील कालिंजर येथील चंदेला राजपूत राजा कीर्तीसिंग चंदेला यांच्या घरी म्हणजेच चंदेली कुटुंबात झाला. ज्या दिवशी राणी दुर्गावतीचा जन्म झाला त्या दिवशी दुर्गाष्टमी होती म्हणून त्यांचे नाव दुर्गावती ठेवण्यात आले. राणीला लहानपणापासूनच घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या इत्यादी युद्धकलेत चांगले प्रशिक्षण मिळाले होते आणि त्या त्यांच्या युद्धक्षमतेसाठी प्रसिद्ध होती.
तसेच लग्नापूर्वी राणी दुर्गावती यांनी दलपत शाहच्या शौर्याबद्दल ऐकले होते. त्यानंतर त्यांना दलपत शाहला आपला जीवनसाथी बनवायचे होते आणि राणीने त्यांना एक गुप्त पत्र लिहिले. या घटनेनंतर लवकरच, शाहने राणीशी त्यांच्या कुलदेवी मंदिरात लग्न केले. त्यांना एक मुलगा देखील झाला. ज्याचे नाव नारायण होते.
राणी दुर्गावती यांच्या पतीच्या मृत्यूच्या वेळी, त्यांचा मुलगा नारायण फक्त ५ वर्षांचा होता, म्हणून त्यांनी स्वतः गढ मंडलाचे राज्य स्वतःच्या हातात घेतले. दिवाण ब्योहर आधार सिंह आणि मंत्री मान ठाकूर यांच्या मदतीने राणी दुर्गावती यांनी १६ वर्षे गोंडवाना राज्यावर यशस्वीरित्या राज्य केले. राणीच्या राजवटीपेक्षा तिच्या शौर्याची आणि धाडसाची जास्त चर्चा झाली.
राणी दुर्गावतीने मुघल सम्राट अकबराच्या सैन्याशी लढा दिला आणि पहिल्याच लढाईत त्यांना आपल्या राज्यातून हाकलून लावले. तसेच शेवटच्या युद्धादरम्यान मुघल मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे घेऊन आले. जेव्हा राणीच्या मंत्र्यांनी मुघल सैन्याच्या ताकदीचा उल्लेख केला तेव्हा राणी म्हणाली, "लाचार होऊन जगण्यापेक्षा सन्मानाने मरणे चांगले. मी माझ्या देशाची सेवा करण्यात बराच काळ घालवला आहे आणि यावेळी मी त्याला कलंकित होऊ देणार नाही. लढण्याशिवाय पर्याय नाही." असे म्हणत राणी दुर्गावती यांनी आपले प्राण देशासाठी अर्पित केले. राणी दुर्गावती यांच्या शौर्याची आणि धाडसाची आठवण आज देखील भारत भूमिमध्ये जपली जाते.
Edited By- Dhanashri Naik