1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (19:47 IST)

COVID-19 3rd Wave: सप्टेंबरमध्ये दररोज ४ लाख कोरोना प्रकरणे येऊ शकतात

कोरोनाव्हायरस संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे, देशातील आणि जगातील मोठ्या संख्येने लोक प्रभावित झाले. भारतातही दुसऱ्या लाटेदरम्यान मोठ्या संख्येने लोक मरण पावले. आता कोरोना संसर्गाची तिसरी लाट (कोविड -19) होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, NITI आयोगाचे सदस्य  VK पॉल यांनी गेल्या महिन्यात सरकारला कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी काही सूचना दिल्या. असे म्हटले होते की भविष्यात प्रत्येक 100 कोरोना विषाणू संसर्ग प्रकरणांपैकी 23 प्रकरणांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करावी लागेल.
 
द इंडियन एक्स प्रेसच्या एका अहवालानुसार, सप्टेंबर 2020 मध्ये दुसऱ्या लाटेआधीच नीती आयोगाने याचा अंदाज लावला होता, परंतु हा अंदाज त्यापेक्षा खूप जास्त आहे. त्यावेळी, गंभीर/मध्यम स्वरूपाची गंभीर लक्षणे असलेल्या सुमारे 20% रुग्णांना NITI आयोगाने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले होते.
 
दुसरीकडे, इंडियन सार्स- कोविड 2 जीनोमिक्स कन्सोर्टियमचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितलं की, 'आणखी तीन आठवडे थांबा म्हणजे, तिसऱ्या लाटेबाबतचं चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरचं मी वास्तविक टिप्पणी करू शकेल.' तसेच 'कोरोना विषाणूची तिसरी एक लाट येणार की, नाही हे जाणून घेण्याबाबत निश्चित अशी पद्धत नाही. पण दुसऱ्या लाटेइतकी ती त्रासदायक नसेल, असं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या यांनी व्यक्त केलं आहे.