शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By
Last Updated : गुरूवार, 11 मार्च 2021 (16:20 IST)

National Safety Day राष्ट्रीय सुरक्षा दिवस निबंध

राष्ट्रीय सुरक्षा दिवस (नॅशनल सेफ्टी डे) भारतात प्रत्येक वर्षी 4 मार्च रोजी पाळला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे आपल्या जीवनातील विविध वेळी जागरूकता नसणे किंवा लक्ष न दिल्यामुळे होणारे अपघात रोखणे. पूर्वी साजरा केलेला राष्ट्रीय सुरक्षा दिन आता राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या आठवड्यात, विविध जागरूकता कार्यक्रमांद्वारे औद्योगिक अपघात टाळण्यासाठीच्या पर्यायांवर लोकांना जागरूक केले जाते. या संपूर्ण आठवड्यात केल्या गेलेल्या प्रत्येक कार्याचा एकमात्र उद्देश म्हणजे लोकांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल जागरूक करणे आणि त्यांना संरक्षणाच्या विविध मार्गांबद्दल जागरूक करणे.
 
राष्ट्रीय सुरक्षा दिन हा देशाच्या सुरक्षा विभागात आणि देशाला सुरक्षा देणारे सर्व सैनिक यांच्यासाठी विशेष रूपाने साजरा केला जातो. या सर्वांमुळे देशाच्या सीमांचे रक्षण होते आणि या कारणास्तव शांतता आणि देशात सुरक्षेची भावना निर्माण होते. या दिवशी आपण सर्वजण, देशवासीय या सर्व सुरक्षा दलांना मनापासून अभिवादन करतो.
 
इतिहास 
हा दिवस अस्तित्वात आणण्याचा उपक्रम नॅशनल सेफ्टी कौन्सिल तर्फेच करण्यात आला. 4 मार्च रोजी भारतात नॅशनल सेफ्टी कौन्सिलची स्थापना झाली म्हणून हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. नॅशनल सेफ्टी कौन्सिल ही एक स्वायत्त संस्था आहे, जी सार्वजनिक सेवेसाठी अशासकीय आणि नफा न घेणार्‍या संस्थेच्या रूपात काम करते. या संघटनेची स्थापना 1966 मध्ये मुंबई सोसायटी अ‍ॅक्ट अंतर्गत करण्यात आली होती, ज्यात आठ हजार सदस्य होते. यानंतर 1972 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि यानंतर लवकरच हे राष्ट्रीय सुरक्षा दिनाऐवजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरे करण्यास सुरवात झाली.
 
राष्ट्रीय सुरक्षा दिवस महत्त्व
हा दिवस त्या सर्व बलिदान करणार्‍यांना समर्पित आहे, ज्यांनी आपले रक्त वाहवून देशाचे रक्षण केले. या दिवशी हिंदुस्थान त्यांच्या धैर्य आणि उत्कटतेला सलाम करतो. आपल्या हृद्यात स्थान असणार्‍या अशा शहिदांच्या शहादलाला कुणी शब्दात कसे सांगू शकेल. 
 
राष्ट्रीय सुरक्षा दिवस कसा साजरा केला जातो
हा दिवस प्रथमच 4 मार्च 1966 रोजी साजरा करण्यात आला, ज्यामध्ये 8 हजार सदस्यांनी हजेरी लावली होती, त्यावेळी हा दिवस देशातील लोकांना सुरक्षिततेकडे जागृत करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेला होता. त्यात देशात, समाजात कशा प्रकारे एकमेकांची सुरक्षा लक्षात घेता कार्य करावे, त्या दिशेने प्रवृत्त केले गेले.
 
राष्ट्रीय सुरक्षा दिन उद्दिष्टे
स्वच्छता: देशाचे संरक्षण केवळ शत्रूपासून संरक्षण नव्हे तर आजारांपासून लोकांना सुरक्षित ठेवणे देखील आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिवस प्रत्येकाला या दिशेने पाऊल टाकण्याचा मार्ग दर्शवितो. देश स्वच्छ ठेवणे देखील सुरक्षेच्या अंतर्गत येतं. ज्यामध्ये सरकार आणि जनता तसेच उद्योगपती जबाबदार आहेत आणि या सर्वांनी एकत्रितपणे देशात स्वच्छता संबंधित सुरक्षा आणणे आवश्यक आहे, अशा प्रकारे स्वच्छता देखील सुरक्षा दिनाचे उद्दिष्ट आहे.
 
अन्न: आजच्या काळात भेसळयुक्त वस्तूंचे प्राबल्य अधिक आहे, यामुळे बर्‍याच रोगांनाही कारणीभूत ठरत आहे आणि ही नवीन जनरेशन यामुळे कमकुवत होत आहे, देशाचे अधिक संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. हा सुरक्षेचादेखील एक भाग आहे.
 
गरिबी: देशातील गरिबांची संख्याही खूप जास्त आहे, यामुळे ते असुरक्षित आहेत. त्यांच्यासाठीही विचार करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. गरिबांना भुकेमुळे मरण्याची वेळ येऊ नये आणि त्यांना जगण्यासाठी काही साधन मिळू शकेल याची काळजी घेतली पाहिजे. हासुद्धा सुरक्षेचा एक भाग आहे.
 
नारी सुरक्षा याबद्दल सर्वांना मिळून कार्य करणे आवश्यक आहे. एखादी घटना घडल्यानंतर शिक्षा देणे न्यायालयाचे काम आहे परंतु या घटनांचा अंत करण्यासाठी आपण सर्वांनी विचार करणे व कार्य करणे आवश्यक आहे. तरच राष्ट्रीय सुरक्षा दिवस या सारखा दिन प्रभावी सिद्ध होईल. 
 
असे अनेक समस्या आणि विषयांवर राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या निमित्ताने कार्य केले पाहिजे जेणेकरून देशात सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल.
 
इतर पैलू
राष्ट्रीय सुरक्षा दिवस संपूर्ण देशात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट सुरक्षिततेसह आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित विविध हालचालींविषयी लोकांना जागरूक करणे आहे. 
हा उत्सव साजरा करण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे सुरक्षिततेसाठी विविध औद्योगिक क्षेत्रात लोकसहभागास प्रोत्साहित करणे. 
वेगवेगळ्या व्यवसाय मालकांद्वारे त्यांच्या कर्मचार्‍यांना विविध सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित क्रियाकलापांमध्ये गुंतवून सहभागी करून घेण्याच्या दृष्टिकोनास प्रोत्साहित करणे. 
या मोहिमेद्वारे, गरजांवर आधारित क्रियाकलाप, कायदेशीर आवश्यकतांसह आत्म-तपासणी आणि कामाच्या ठिकाणी अधिकृत आरोग्य सुरक्षा आणि वातावरणाशी संबंधित क्रियाकलापांना पार पाडणे.
मालक आणि कर्मचार्‍यांना त्यांच्या कायदेशीर जबाबदारीची आठवण करून देऊन कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्मित करणे.
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सावधगिरीच्या प्रवृत्तीसह सुरक्षिततेस प्रोत्साहित करणे.