शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 12 मे 2021 (10:14 IST)

अथर्वशीर्ष : बुद्धी आणि मन स्थिर करुन यश प्रदान करणारा पाठ

थर्व म्हणजे हलणारे आणि 
अथर्व म्हणजे 'न हलणारे शीर्षम् ' !!
 
सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे
अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी
असलेलं मस्तक...!! 
 
अथर्वशीर्षाचं पठण केलं, की
बुद्धी आणि मन स्थिर होतं, अशी
गणेश उपासकांची श्रद्धा असते. 
 
स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं
कांम हे नेहमी यशस्वी होतं.
आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस
नम्र होतो. असा माणूस मग
अडचणींमध्येही संधी शोधू
लागतो, अशी गणेश उपासकांची
श्रद्धा असते. 
 
आपण नेहमी पाहतो, की
जीवनांत यशस्वी होणारी माणसं
ही नेहमी अडचणींमध्ये संधी
शोधणारी असतात आणि
जीवनांत नेहमी अयशस्वी होणारी
माणसं ही संधी आली असतांना
अडचणी सांगत बसतात. 
 
अथर्वशीर्ष पठणामुळं मन 
एकाग्र होतं. त्यामुळं असं हे
कदाचित घडत असंल. 
 
आपल्या मनाची ताकद वाढविणं,
हे आपल्याच हातात असतं.
माणसाचं मन ही मोठी विलक्षण
गोष्ट आहे. शरीराबरोबरच मन
कणखर असंल, तर मग आपण
संकटांवर मात करू शकतो. 
 
मन स्थिर असंल, तर आपण ते
वर्तमानांत  ठेऊन प्रत्येक कांम
करू शकतो. 
 
बऱ्यांच लोकांचं मन हे कांम
करतांना वर्तमान काळात राहात
नाही. नेहमी रस्ता नीटपणे
ओलांडणारा माणूस जर त्याचं
मन वर्तमान काळात नसेल, तर
रस्ता ओलांडताना समोरून
येणारं वाहन त्याला दिसत नाही
आणि अपघात घडतो. 
 
नेहमी मन वर्तमानकाळांत आणि
स्थिर असणं आवश्यक असतं. 
बऱ्याचवेळा  माणसाचं शरीर 
वर्तमानकाळांत असलं, तरी मन
भूतकाळात किंवा भविष्यकाळांत
विहार करीत असतं. 
 
मन भूतकाळांत असलं, 
तर सारख्या दु:खद घटना
आठवत राहतात आणि मन
भविष्यकाळांत असलं, तर 
चिंता भेडसावू लागतात. 
 
आपलं शरीर असतं वर्तमान
कांळात, पण मनाला
भूतकाळातील दु:खाचं आणि
भविष्यकाळातील चिंतेचं ओझं
सांभाळण्याचा प्रयत्न करावा
लागतो. 
 
मग माणसाच्या हातून होणारं 
कांम हे नीट होत नाही. म्हणून
बुद्धी आणि मन हे स्थिर राहणं 
गरजेचे असतं. 
 
हे काम अथर्वशीर्ष पठणानं 
साध्य होतं, असं गणेश
उपासकांचं मत आहे. 
 
अथर्वशीर्षाचा पाठ एकदा, 
अकरा वेळा, एकवीस वेळा 
किंवा एक सहस्र वेळा केला
जातो. 
 
तुम्ही कधी अथर्वशीर्षाचा पाठ
म्हटला आहे कां ? एकदा तरी
अनुभव घेण्यास हरकत नाही.
तुम्ही श्रद्धाळू असाल, तर माझं 
हे म्हणणं तुम्हाला नक्कीच
पटेल. जर तुम्ही श्रद्धाळू नसाल,
आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक
दृष्टिकोनातून पाहत असाल,
तरीही अथर्वशीर्ष तुम्हाला
नक्कीच आवडेल. 
 
कारण अथर्वशीर्षामध्ये गणेश
म्हणजे या विश्वातील निसर्ग...!!
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि
आकाश या पंचमहाशक्तीच 
आहे, असे म्हटले आहे.
 
हा निसर्ग म्हणजेच ईश्वर हे
म्हणणं तुमच्या वैज्ञानिक
दृष्टीकोनाला नक्कीच पटेल. 
या निसर्गाला आपण जपलेच
पाहिजे. तरच निसर्ग आपणांस
जपेल असेही म्हणतां येईल.
 
अथर्वशीर्षाचा अर्थ
मूळ श्रीगणपती अथर्वशीर्ष
संस्कृतमध्ये आहे. आपण आज
त्याचा मराठी अनुवाद पाहू या. 
 
'हे देवहो, आम्हांला कानांनी 
शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांनी
चांगलं पाहावयास मिळो.
 
सुदृढ अवयवांनी आणि शरीरांनी
देवानं (निसर्गानं) दिलेलं आयुष्य
देवाच्या (निसर्गाच्या) स्तवनांत
व्यतीत होवो. 
 
सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करतो.
ज्ञानवान सूर्य आमचं कल्याण
करतो. संकटांचा नाश करणारा
गरूड आमचं कल्याण करतो.
बृहस्पती आमचं कल्याण करतो.
सर्वत्र शांती नांदो...!! 
 
ॐकाररूपी गणेशाला नमस्कार
असो. तूच ब्रह्मतत्त्व आहेस. 
तूच सकलांचा कर्ता (निर्माता)
आहेस. तूच सृष्टीचे धारण
करणारा, पोषण करणारा आहेस.
तूच सृष्टीचा संहार करणाराही 
आहेस. हे सर्व ब्रह्मस्वरूप 
खरोखर तूच आहेस. तूच नित्य
प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस. 
 
मी योग्य तेच बोलतो, मी खरं
तेच बोलतो. तू माझे रक्षण कर.
तुझ्याबद्दल बोलणाऱ्या माझं, 
तू रक्षण कर. तुझे नांव श्रवण
करणाऱ्या माझं तू रक्षण कर.
दान देणाऱ्या अशा माझं तू 
रक्षण कर. उत्पादक अशा, 
माझं तू रक्षण कर. तुझी 
उपासना करणाऱ्या शिष्याचं 
रक्षण कर.    
 
माझं पश्चिमेकडून रक्षण कर.
माझं पूर्वेकडून रक्षण कर. 
माझं उत्तरेकडून रक्षण कर. 
माझं दक्षिणेकडून रक्षण कर.
माझं वरून रक्षण कर. 
माझे खालून रक्षण कर. 
सर्व बाजूनीं, सर्वप्रकारे तू 
माझं रक्षण कर. 
 
तू वेदादी वाड॒.मय आहेस. 
तू चैतन्यस्वरूप आहेस. 
तू ब्रह्ममय आहेस. 
तू सत् , चित् , आनंदस्वरूप,
अद्वितीय आहेस. 
तू साक्षात ब्रह्म आहेस. 
तू ज्ञानविज्ञानमय आहेस. 
 
हे सर्व जग तुझ्यापासूनच 
निर्माण होतं. हे सर्व जग 
तुझ्या आधारशक्तीनेच 
स्थिर राहातं. 
हे सर्व जग तुझ्यातच लय पावतं,
हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच
उत्पन्न होतं. 
 
पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि
आकाश ही पंचतत्त्वे तूच आहेस.
तसेच परा, पश्यन्ती, मध्यमा
आणि वैखरी या चार वाणी तूच
आहेस. 
 
तू सत्त्व, रज आणि तम या 
तीन गुणांपलीकडचा आहेस. 
तू स्थूल, सूक्ष्म आणि आनंद 
या तीन देहांपलीकडचा आहेस. 
 
तू भूत, वर्तमान आणि भविष्य
या तीनही काळांच्या पलीकडचा
आहेस. तू सृष्टीचा मूल आधार
म्हणून स्थिर आहेस.
 
तू उत्पत्ती, स्थिती आणि लय
या तीनही शक्तींच्या पलीकडचा
आहेस. योगी लोक नेहमी तुझं
ध्यान करतात. 
 
तूच ब्रह्मा,तूच विष्णू, तूच रुद्र,
तूच इंद्र, तूच भूलोक, तूच
भुवर्लोक, तूच स्वर्लोक आणि 
ॐ हे सर्व तूच आहेस. 
 
गण शब्दातील आदि ' ग् ' 
प्रथम उच्चारून नंतर 'अ 'चा
उच्चार करावा. त्यानंतर
अनुस्वाराचा उच्चार करावा. 
तो अर्ध चंद्राप्रमाणे असावा. 
तो तारक मंत्रानं ॐ कारानं 
युक्त असावा. हा संपूर्ण मंत्र 
'ॐगं ' असा होतो. 
 
हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे. 
'ग्' हे मंत्राचे पूर्व रूप आहे. 
' अ' हा मंत्राचा मध्य आहे.
अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे.
अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप
आहे. 
 
या गकारादी चारांपासून एक नाद
तयार होतो. हा नादही एकरूप
होतो. ती ही गणेशविद्या होय. 
 
या मंत्राचे ऋषी ' गणक ' हे होत. 
'निचृद् गायत्री ' हा या मंत्राचा छंद
होय. गणपती ही देवता आहे. 
 
'ॐ गं 'ह्या मंत्ररूपानं दर्शविल्या
जाणाऱ्या गणेशाला माझा
नमस्कार असो.
 
आम्ही त्या एकदंताला जाणतो.
त्या वक्रतुण्डाचं ध्यान करतो.
म्हणून तो गणेश आम्हाला 
स्फूर्ती देवो. 
 
ज्याला एक दात असून पाश,
अंकुश व दात धारण केलेले तीन
हात आणि वर देण्यासाठी चौथा
हात आहे. ज्याचे उंदीर हे वाहन
आहे. ज्याच्या शरीराचा रंग लाल
असून पोट मोठे आहे, कान
सुपासारखे आहेत, ज्याने लाल
रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत,
अंगाला लाल चंदन लावले आहे,
ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा
केली आहे, भक्तांविषयी पूर्ण दया
असलेला, अविनाशी, सृष्टीच्या
आधी निर्माण झालेला,
प्रकृतिपुरुषाहून वेगळा असलेला,
अशा गणेशाचे जो ध्यान करतो,
तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय.
 
व्रतधारिणांच्या प्रमुखांना,
व्रातपतीस नमस्कार असो.
 
देवसमुदायांच्या अधिपतीला
नमस्कार असो,
 
शंकरगणसमुदायाच्या 
अधिपतीला प्रमथपति 
नमस्कार असो, 
 
लंबोदर, एकदंत, विघ्ननाशी,
शिवपुत्र, वरदमूर्ती अशा
गणपतीला माझा नमस्कार
असो.
 
हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या या 
गणपती अथर्वशीर्षाचा हा मराठी
अनुवाद जरी वाचला, तरी त्या
रचनाकाराच्या बुद्धिमत्तेचं आश्चर्य
वाटतं आणि बरोबरच त्यालाही
नमस्कार करण्यासाठी आपले
हात सहजपणानं, आदरानं