1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. papmochani-ekadashi

पापमोचनी एकादशी : या सरळ विधीने करा हे व्रत

papmochani-ekadashi
पापमोचनी एकादशी : या सरळ विधीने करा हे व्रत, ही आहे कथा 
 
चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी असते.  यंदा ही एकादशी 24 मार्च, शुक्रवारी आहे. या व्रताची विधी या प्रकारे आहे -
 
व्रत विधी  
पापमोचनी एकादशीच्या विषयावर भविष्योत्तर पुराणात विस्तारात वर्णन करण्यात आले आहे. या व्रतात विष्णूच्या चतुर्भुज रूपाची पूजा केली जाते. एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान आदी करून व्रताचे संकल्प करावे. संकल्प केल्यानंतर षोडशोपचार (16 साहित्याने) समेत विष्णूची पूजा करायला पाहिजे.  
 
पूजा केल्यानंतर देवासमोर बसून भगवद् कथेचा पाठ करावा किंवा एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून करवून घ्यावा. कुटुंबियांसमेत बसून भगवद् कथा ऐकायला पाहिजे. रात्रभर जागरण करावे.  
 
द्वादशी तिथी (25 एप्रिल, शनिवार)ला सकाळी स्नान करून विष्णूची पूजा केली पाहिजे नंतर ब्राह्मण भोज करवून दक्षिणा समेत त्यांना विदा केले पाहिजे. त्यानंतर स्वत:ने भोजन केले पाहिजे. या प्रकारे पापमोचनी एकादशीचा व्रत केल्याने विष्णू प्रसन्न होतात आणि व्रतीच्या सर्व पापांचा नाश होतो.  
 
पुढे बघा पापमोचनी एकादशी व्रतकथा
पापमोचनी एकादशी व्रत की कथा
फार वर्ष आधी मांधाता नावाचा एक पराक्रमी राजा होता. राजा मांधाताने लोमश ऋषीला विचारले की जर मनुष्याकडून नकळत काही पाप झाले असतील तर त्यातून कशा प्रकारे मुक्ती मिळवू शकतो? तेव्हा लोमश ऋषींनी राजाला एक कथा सांगितली की चैत्ररथ नावाचे सुंदर वनात च्यवन ऋषीचे पुत्र मेधावी ऋषी तपस्येत लीन होते. या वनात एक दिवस मंजुघोषा नावाच्या अप्सरेची दृष्टी ऋषींवर पडते, तेव्हा ती त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागते.  
 
कामदेव त्या वेळेस तेथून जात होते. त्यांची दृष्टी अप्सरेवर गेली आणि ते तिची मदत करू लागले. अप्सरा आपल्या प्रयत्नात यशस्वी झाली आणि ऋषीची तपस्या भंग झाली. ऋषी महादेवाच्या तपस्येचे व्रत विसरून गेले आणि अप्सरासोबत रमण करू लागले. बर्‍याच वर्षांनंतर जेव्हा त्यांची चेतना जागली तेव्हा त्यांना भास झाला की ते महादेवाच्या तपस्येने विरक्त झाले आहे.  त्यांना त्या अप्सरावर फार क्रोध आला आणि तपस्या भंग करण्याबद्दल दोषी असल्यामुळे ऋषीने अप्सराला श्राप दिला की तू पिशाचिनी बनून जा.  
 
श्रापाने दुखी होऊन ती ऋषीच्या पायात पडली आणि श्रापापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करू लागली. ऋषीने तेव्हा त्या  अप्सरेला विधी सहित चैत्र कृष्ण एकादशी (पापमोचिनी एकादशी)चे व्रत करण्यास सांगितले. विलासितेत रमलेल्या ऋषीचे तेज देखील लोप झाले होते. म्हणून ऋषीने देखील या एकादशीचे व्रत केले, ज्याने त्याचा पाप नष्ट झाला. तिकडे अप्सरापण या व्रताच्या प्रभावामुळे पिशाच योनीतून मुक्त झाली आणि तिला सुंदर रूप प्राप्त झाला व ती परत स्वर्गात गेली. 
पुढील लेख
गुढीपाडवा: कडुनिंबाचे महत्त्व