संबंधित माहिती
- बिल्वाष्टकम् Bilvaashtakam या मंत्रासह करा भगवान शिवाची बिल्वपत्र पूजा
- Somvati Amavasya 2026 वर्षातील पहिली सोमवती अमावस्या: दुर्मिळ योगांचा संयोग
- दर्श अमावस्या 2026 या दिवशी ही 5 कामे केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळेल
- रविवारबद्दल शास्त्रांशी संबंधित 20 तथ्ये, तुम्हाला बहुतेकच माहीत असतील
- Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा
यौवन आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी 'रंभाव्रत', पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या
Rambha Tritiya Vrat 2026: रंभाव्रत ज्याला 'रंभा तृतीया' असेही म्हणतात हे प्रामुख्याने महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाणारे व्रत आहे. हे व्रत हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध तृतीयेला केले जाते.
रंभाव्रत म्हणजे काय?
पौराणिक कथेनुसार, स्वर्गलोकातील सर्वात सुंदर अप्सरा 'रंभा' हिने तिचे सौंदर्य, यौवन आणि उत्तम आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी हे व्रत केले होते. दुसऱ्या एका कथेनुसार, याच दिवशी समुद्रमंथनातून रंभा प्रकट झाली होती.
हे व्रत प्रामुख्याने सौंदर्य, उत्तम आरोग्य, अखंड सौभाग्य आणि इच्छित वर प्राप्तीसाठी केले जाते. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी, तर अविवाहित मुली योग्य जोडीदार मिळण्यासाठी हे व्रत करतात.
रंभा व्रत पूजा विधी
व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूर्वेकडे तोंड करून बसावे.
व्रताचा संकल्प करावा.
रंभा देवीची मूर्ती किंवा छायाचित्र स्थापित करावे.
मग, भगवान गणेशाचे ध्यान करावे.
त्यानंतर, गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि पूजेसाठी गहू, लाल फुले व हंगामी फळे ठेवावीत.
पूजेदरम्यान बांगड्या, पैंजण, आलता (लाल रंग), सुगंधी द्रव्य (अत्तर) आणि इतर सौंदर्यप्रसाधने अर्पण करावीत.
या दिवशी प्रामुख्याने माता लक्ष्मी आणि अप्सरा रंभा यांचे आवाहन केले जाते. रंभा ही सौंदर्याचे प्रतीक असल्याने, पूजेच्या ठिकाणी काचेच्या बांगड्या किंवा सोन्या-चांदीचे दागिने ठेवून त्यांची रंभा आणि लक्ष्मीचे रूप मानून पूजा केली जाते.
देवीला पुरी, खीर किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.
पूजेदरम्यान माता लक्ष्मीची आरती करावी.
पूजा संपन्न झाल्यानंतर सौभाग्यवती महिलांना वाण (सुवासिक वस्तू, बांगड्या, गंध) देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे.
आपल्या सोयीप्रमाणे पूर्ण दिवस उपवास करावे आणि संध्याकाळी सात्त्विक भोजन करून उपवास सोडावे.
रंभा तृतीयेचे व्रत पाळल्याने साधकाला रोगांपासून मुक्ती मिळते आणि चिरतरुणत्व प्राप्त होते. हे व्रत शरीरावरील वृद्धत्वाची सर्व चिन्हे नाहीशी करते. असे मानले जाते की, हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि आकर्षण येते, ज्यामुळे ती व्यक्ती ज्यांना भेटते त्यांना भुरळ घालते. शिवाय, हे व्रत करणारी व्यक्ती सर्वांची प्रिय बनते आणि तिला आपला आदर्श जीवनसाथी मिळवण्यात यश येते.
