शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

कार्तिक महिन्यात करा तुळशीच्या 11 पानांचे हे 3 उपाय, दूर होईल तुमचे दुर्भाग्य

कार्तिक महिन्यात व्रत,पूजा आणि स्नान करण्याचे हिंदू धर्मात खास महत्त्व असत. कार्तिक महिन्याला सर्वात पवित्र महिना मानला जातो. कार्तिक महिन्यात तुळशी पूजेचे महत्त्व अधिकच वाढून जात. या महिन्यात शालिग्राम आणि तुळशी विवाह देखील होतो. 
 
बरेच प्रयत्न केल्यानंतर देखील तुम्हाला कुठल्याही कामात यश मिळत नाही, दुर्भाग्य काही केल्या तुमचा पिच्छा सोडत नसेल तर कार्तिक महिन्यात तुळशीच्या पानांचा उपाय केल्याने लक्ष्मी आणि धन कुबेराची कृपा प्राप्त होते. तुमच्या सर्व अडचणी दूर होतात. तर जाणून घेऊ या उपायांबद्दल.  
 
नोकरी मिळवणे, व्यवसायात प्रगती करण्यासाठी गुरुवारी तुळशीचा पौधा पिवळ्या कपड्यात बांधून ऑफिस किंवा दुकानात ठेवा. असे केल्याने तुमच्या व्यवसायात वाढ होईल आणि नोकरीत प्रमोशन देखील मिळेल.  
 
कार्तिक महिन्यात घरात तुळशीचे रोप लावावे तसेच श्रीहरी नारायणाचे चित्र किंवा प्रतिमा घरात ठेवावी आणि या फोटोत तुळशीचे 11 पान बांधून द्यावे. असे केल्याने घरात कधीही  संपत्तीची कमी येत नाही.  
 
धन लाभ मिळवण्यासाठी सकाळी उठून तुळशीचे एकूण 11 पान तोडावे. या पानांना तोडण्या अगोदर तुळशीला हात जोडून क्षमा मागावी आणि नंतर ते तोडावे. घरातील त्या भांड्यांमध्ये ठेवावे जेथे तुम्ही कणीक ठेवता. या कणकेचा प्रयोग केल्याने काही दिवसांमध्ये तुम्हाला घरात बदल दिसू लागेल.