संबंधित माहिती
- Beautiful Valleys in India जुलै-ऑगस्टमध्ये भारतातील या ४ सुंदर दऱ्यांना भेट द्या, पावसाळ्यात स्वर्गासारख्या भासतात
- Wonderful Matheran आशियातील एकमेव 'वाहनमुक्त' थंड हवेचे ठिकाण माथेरान
- भीरा धरणाच्या बॅकवॉटर कुशीत वसलेला ३०० फूट उंचीवरून कोसळणारा ''देवकुंड धबधबा''
- "मुंबई-पुण्याजवळची ५ 'हिडन' ठिकाणे; जिथे पावसाळ्यात गर्दीशिवाय निसर्गाचा आनंद घेता येईल
- केवळ किल्ले आणि राजवाडेच नव्हे, तर राजस्थानमधील हे सुंदर धबधबे तुमचे मन जिंकतील
Visapur Fort प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला; ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी आवडीचे ठिकाण
विसापूर किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ असलेला एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी, विशेषतः पावसाळ्यात, हे एक अत्यंत आवडीचे ठिकाण आहे.
विसापूर ३०३८ फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
पायऱ्यांच्या साहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहे. यात ३० ते ४० जणांची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहे. गडावरील पठारावर लांबावर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे.
इतिहास
विसापूर किल्ल्याची निर्मिती पेशवे घराण्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी १७१३ ते १७२० या काळात केली होती. हा किल्ला त्याच्या शेजारीच असलेल्या प्रसिद्ध 'लोहगड किल्ल्या'पेक्षा उंचीने जास्त आहे. रणनीतीच्या दृष्टीने लोहगडवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याच्या संरक्षणासाठी विसापूर किल्ल्याचा वापर केला जात असे. १८१८ मध्ये जेव्हा इंग्रजांनी मराठा साम्राज्यावर आक्रमण केले, तेव्हा त्यांनी विसापूर किल्ल्यावरून लोहगडवर तोफांचा मारा केला होता आणि दोन्ही किल्ले आपल्या ताब्यात घेतले होते.
प्रमुख आकर्षणे
पावसाळ्यात विसापूर किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्यावर चढताना वाटेत असणाऱ्या दगडी पायऱ्यांवरून वाहणारे पाणी. या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा ट्रेक करणे हा एक थरारक आणि विहंगम अनुभव असतो. किल्ल्याची तटबंदी अजूनही बऱ्याच अंशी भक्कम स्थितीत आहे. या तटबंदीवरून आजूबाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचा आणि पवन धरणाचा सुंदर नजराणा दिसतो. किल्ल्यावर पेशवेकालीन एक मोठी आणि वजनदार तोफ पाहायला मिळते. तसेच किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची अनेक टाकी आणि जुन्या गुहा आहे. तसेच काही मंदिरांचे अवशेष आणि मारुतीची मूर्तीही पाहायला मिळते.
विसापूर किल्ला जावे कसे?
रेल्वेने: लोणावळा किंवा पुणे येथून लोकल ट्रेनने 'मळवली' रेल्वे स्टेशनला उतरावे. मळवली स्टेशनवरून पायथ्याच्या भाजे गावापर्यंत जाण्यासाठी ऑटो रिक्षा मिळतात किंवा चालतही जाता येते.
रस्त्याने: मुंबई-पुणे जुन्या हायवेवरून कार किंवा बाईकने मळवली मार्गे थेट भाजे किंवा पाटण गावापर्यंत पोहोचता येते.
जर तुम्ही पावसाळ्यात विसापूर किल्ल्याला भेट देणार असाल, तर ट्रेकिंगचे बूट नक्की वापरा, कारण पायऱ्यांवरून पाणी वाहत असल्याने तिथे शेवाळ आणि घसरन जास्त असते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
विसापूर ३०३८ फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
पायऱ्यांच्या साहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहे. यात ३० ते ४० जणांची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहे. गडावरील पठारावर लांबावर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे.
विसापूर किल्ल्याची निर्मिती पेशवे घराण्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी १७१३ ते १७२० या काळात केली होती. हा किल्ला त्याच्या शेजारीच असलेल्या प्रसिद्ध 'लोहगड किल्ल्या'पेक्षा उंचीने जास्त आहे. रणनीतीच्या दृष्टीने लोहगडवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याच्या संरक्षणासाठी विसापूर किल्ल्याचा वापर केला जात असे. १८१८ मध्ये जेव्हा इंग्रजांनी मराठा साम्राज्यावर आक्रमण केले, तेव्हा त्यांनी विसापूर किल्ल्यावरून लोहगडवर तोफांचा मारा केला होता आणि दोन्ही किल्ले आपल्या ताब्यात घेतले होते.
प्रमुख आकर्षणे
पावसाळ्यात विसापूर किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्यावर चढताना वाटेत असणाऱ्या दगडी पायऱ्यांवरून वाहणारे पाणी. या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा ट्रेक करणे हा एक थरारक आणि विहंगम अनुभव असतो. किल्ल्याची तटबंदी अजूनही बऱ्याच अंशी भक्कम स्थितीत आहे. या तटबंदीवरून आजूबाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचा आणि पवन धरणाचा सुंदर नजराणा दिसतो. किल्ल्यावर पेशवेकालीन एक मोठी आणि वजनदार तोफ पाहायला मिळते. तसेच किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची अनेक टाकी आणि जुन्या गुहा आहे. तसेच काही मंदिरांचे अवशेष आणि मारुतीची मूर्तीही पाहायला मिळते.
विसापूर किल्ला जावे कसे?
रेल्वेने: लोणावळा किंवा पुणे येथून लोकल ट्रेनने 'मळवली' रेल्वे स्टेशनला उतरावे. मळवली स्टेशनवरून पायथ्याच्या भाजे गावापर्यंत जाण्यासाठी ऑटो रिक्षा मिळतात किंवा चालतही जाता येते.
रस्त्याने: मुंबई-पुणे जुन्या हायवेवरून कार किंवा बाईकने मळवली मार्गे थेट भाजे किंवा पाटण गावापर्यंत पोहोचता येते.
जर तुम्ही पावसाळ्यात विसापूर किल्ल्याला भेट देणार असाल, तर ट्रेकिंगचे बूट नक्की वापरा, कारण पायऱ्यांवरून पाणी वाहत असल्याने तिथे शेवाळ आणि घसरन जास्त असते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: ऐतिहासिक भव्यता आणि सौंदर्याने नटलेला; समुद्रात उभा अलिबागच्या 'अष्टागराचा राजा' कुलाबा किल्ला
